फोटो सौजन्य: गुगल
एका मुलाखतीत मंदारने सांगितलं की, त्याची पहिली मालिका ‘अल्लीदन’. या मालिकेतून त्याने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मंदारने अनेक छोट्या मोठ्या हिंदी मालिकेत काम करत असताना त्याला एका मराठी मालिकेत मुख्य भूमिकेसाठी विचारण्यात आलं. यामागे देखील खूप मोठा किस्सा असल्य़ाचं त्याने सांगितलं आहे.
मंदार जाधवने पहिल्यांदा ‘अल्लीदन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर त्याने इतर मालिका आणि क्राइम शोमध्ये काम केलं. अशातच आता ‘सर्व काही’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने तो मराठी मालिकांकडे कसा वळला याबद्दल सांगितलं आहे. मंदारने यावेळी त्याची पहिली मालिका ‘श्री गुरुदेव दत्त’ त्याला कशी मिळाली यामागचा किस्सा सांगितलं आहे.
मंदार म्हणाला की, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ ही त्याची पहिली मराठी मालिका. या मालिकेतील दत्तगुरुंच्या भुमिकेसाठी त्याची निवड झाली खरी पण त्यामागे देखील एक ट्विस्ट होता. खरंतर या मालिकेसाठी मंदारला नाही तर त्याचा भाऊ मेघन याला फोन आलेला. पण मेघन आधीच एका मालिकेत व्यस्त होता त्यामुळे त्याला ही मालिका करणं शक्य नव्हतं. तेव्हा मेघनने माझं नाव सुचवलं. मेघनने सांगितलं की, माझा भाऊ देखील याच क्षेत्रात काम करतो तुम्ही त्याची एकदा ऑडीशन घेऊ शकता.
मंदार पुढे असं देखील म्हणाला की मराठीत काम करायला काहीच अडचण नव्हती पण पाहिजे तशा ऑफर येत नव्हत्या. पुढे मंदार असं देखील म्हणाला की, पहिलाीच मराठी मालिका त्यात पण भुमिका आव्हानात्मक होती. कारण दत्तगुरु ऑनस्क्रिन साकारण मोठा टास्क होता. पण जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं तेच घडतं त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी मिळायचं ते तुम्हाला मिळतच.
मंदारने पुढे आणखी किस्सा सांगितला की, दत्तगुरुंच्या मालिकेसाठी दिग्दर्शक संतोष देवधर यांना सगळं श्रेय जातं. मेघनच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी मला कॉल केला. मी त्यांना म्हणालो सर मला मराठी मालिका करायची आहे पण, मला पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिकेतून एन्ट्री घ्यायची आहे की नाही याबद्दल गोंधळ उडालेला आहे. तरी त्यांनी मला सांभाळून घेतलं.
मंदारने सांगितला ऑडिशनचा किस्सा
मंदार पुढे म्हणाला, ऑडिशनच्या वेळी भेट झाली ती निर्माते दीपक देऊळकर यांची. मी अंधेरीला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तिथे दत्तगुरुंच्या भुमिकेसाठी 150 मुलं ऑडिशनला आलेली. तिथे मला स्क्रिप्ट दिली मी हिंदीमध्ये ऐतिहासिक, पौराणिक मालिका केल्या होत्या. त्यामुळे मला पौराणिक भुमिकांची तशी सवय होती. त्यामुळे मी आत्मविश्वासाने ऑडीशन दिली. त्यांना ती आवडली.
तेव्हा त्यांनी मला तू शर्ट काढशील का असं विचारलं मी म्हटलं का सर? ते म्हणाले नाही आम्हाला तुझी शरीरयष्टी पाहायची आहे. कारण ही जी भूमिका आहे त्यात तुझ्या अंगावर काही नसणार आहे. रुद्राक्ष आणि माळा असतील. मग मी शर्ट काढला तेव्हा मला खूप संकोच वाटला होता. त्यांनी रेकॉर्ड वगैरे केलं मी फिट होतो पण, तितका नाही. मग मी घरी आलो.नंतर मला फोन आला की दत्तगुरुंच्या भूमिकेसाठी आम्ही तुझी निवड करत आहोत. तू तुझी बॉडी बनव. तयारी कर. आणि अशा पद्धतीने माझी मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री झाली. त्यामुळे मला असं वाटतं की दत्त गुरुची ही इच्छा होती की मी ही भूमिका साकारावी.” आणि आज जरी मी अनेक मराठी मालिका केल्या तरी दत्तगुरुंची मालिका माझ्यासाठी कायमच जवळची असेल.






