गर्मीच्या दिवसांमध्ये तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यानंतर अपचनाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. उलट्या, जुलाब होऊन शरीरातील पाण्याची पातळी पूर्णपणे कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे रक्तदाब कमी होणे, थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढत्या गर्मीमुळे जुलाब किंवा उलट्या इत्यादी आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत असतील तर आहारात या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि शरीराला सुद्धा फायदे होतील. कडाक्याच्या गर्मीमध्ये अतिशय हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. (फोटो सौजन्य – istock)
गर्मीमुळे जुलाब होऊन पोट बिघडले आहे? मग 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका

पोटात वाढलेला संसर्ग कमी करण्यासाठी दही किंवा ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे उष्णता कमी होण्यासोबतच आतड्यांमध्ये चांगल्या विषाणूची वाढ होते आणि आतड्यांची हालहाल सुलभ राहते.

कडाक्याच्या गर्मीमध्ये तिखट किंवा तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नये. आहारात डाळ, भात, भाजी, चपाती इत्यादी सात्विक अन्नपदार्थांचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.

सतत जुलाब होत असल्यास केळी खावी. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि पेक्टिन नावाचे फायबर असते, ज्यामुळे मल घट्ट होण्यास मदत होते.

नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि थकवा अशक्तपणापासून सुटका मिळते. नारळ पाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाईनट्स मोठ्या प्रमाणावर असतात.

शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ओ आर एस किंवा शरीराला ऊर्जा देणाऱ्या पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीरातील पाण्याची पातळी सहज भरून निघते आणि थकवा कमी होतो.






