'राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?' गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबो
दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कामगार संघटनेचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर आणि मनसेवर जोरदार टीका केली.
सदावर्ते म्हणाले की, “सोनम वांगचुक यांचे आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या आणि वैद्यकीय परीक्षांच्या भावनांचा वापर करून ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ करण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी संविधानाच्या चौकटीत राहूनच आंदोलन झाले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “भारतीय संविधान आणि सीबीआयवर सोनम वांगचुक यांचा विश्वास नाही का?” तसेच मरेपर्यंत उपोषण करण्याची भूमिका संविधानाच्या चौकटीत योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्यावर टीका करत सदावर्ते म्हणाले, “नीट पेपरफुटीप्रकरणी सोनम वांगचुक आणि राज ठाकरेंना तपास अधिकारी करायचं का? ढोबळ भाषेत सांगायचं तर, राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?” ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे आता वाजंत्रीवाल्यासारखे प्रत्येक आंदोलनात भूमिका घेत आहेत. त्यांच्या मते, पेपरफुटीचा तपास यंत्रणा करत असताना त्यावर विश्वास ठेवायला हवा.
सदावर्ते यांनी अमित ठाकरे यांच्यावरही टीका केली. “टीईटी पेपरफुटीसारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलले असते तर अधिक प्रगल्भ वाटले असते,” असे ते म्हणाले. तसेच मनसे हा आता कौटुंबिक पक्ष बनल्याचा आरोप करत त्यांनी अमित ठाकरेंच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून सुनेत्रा पवार नाराज? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर
देशाचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या अनिश्चितकालीन उपोषणाचा आज विसावा दिवस आहे. तर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 27 वा दिवस आहे. सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांनी या आंदोलनाच्या माध्यतून देशातील शिक्षण सुधारणेसाठी आणि पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे.






