शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी मुलांना जन्माला घालण्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Sambhaji bhide controversial statement : नाशिक : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी अनेकदा गरळ ओकली आहे. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या सर्वधर्मसमभाव आणि मुलं जन्माला घालणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. आंबा खाऊन मुलं होतात असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.
काय म्हणाले संभाजी भिडे?
नाशिक दौऱ्यावर असताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सर्वधर्म समभाव हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरूष म्हणजे नपुंसकपणा आहे. सर्वधर्मसमभाव हा नीचपणा आहे. स्वातंत्र्यावेळी तिरंगा झेंडा आपण स्वीकारला. तिरंगा आणि संविधान आपण मानलेच पाहिजे. पण भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतिक आहे. त्यामुळे देव, देश आणि धर्मासाठी कटिबद्ध राहा. 15 ऑगस्टला तिरंगा फडकवूच पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू, सगळ्यांमध्ये सामील होऊ, तिरंगा फडकू. पण डोक्यात हिरोजी फर्जंद यांनी सांगितले ते काम करू,असे संभाजी भिडे म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संभाजी भिडे यांनी मुलांना जन्माला घालण्याबाबत देखील विचित्र भूमिका मांडली आहे. आंबा खाऊन मुलं होतात, या वक्तव्यावर संभाजी भिडे हे ठाम आहेत. त्यांनी नाशिक येथील कार्यक्रमात या वक्तव्याचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले की, मी आंबे खाऊन मुलं होतात, असं बोललो होतो. मी एक आंब्याचं झाड लावलं आहे. तिथे आजही तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. त्या वक्तव्यावरून माझ्यावर खटला सुरू आहे, असे देखील संभाजी भिडे यांनी सांगितले आहे.
“सोयराबाई यांना जे वाटतं होत ते शक्य नव्हतं, सोयराबाई यांना छत्रपती संभाजी महाराज राजा व्हावं असं वाटत नव्हते. राजाराम महाराज हे संभाजी महाराज यांच्या नंतर राजे झालेच. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात साम्य काय तर, संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांच्या तोडीस तोड व्यक्तीमहत्व होते. संभाजी महाराज यांच्या पत्नीचा भाऊ गणोजी शिर्के हा नालायक माणूस ज्यानं वतनासाठी शेण खाल्लं,” असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी वक्तव्य केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्रविद्येचे ज्ञान देत संभाजी भिडे म्हणाले की, “खग्रास ग्रहाच्या काळात एकदा मनुष्य एखाद्या मंत्राचा जप करेल त्याला त्या मंत्राची शक्ती मिळते. जन्मोजन्मी शक्ती मिळते. गायत्री मंत्राचा जप शिवाजी महाराज यांनी केला होता, अंगावरचे कपडे काढून मानेपर्यंत शीत (थंड)पाण्यात काही तास होते. तीन एप्रिल रोजी त्यांना ताप असाह्य झाला. तोंडांवाटे पाणी दिलेले शरीरातून बाहेर पडत होते. शरीर पूर्ण खचले होते. शिवाजी महाराज हे उपस्थित असलेल्या व्यक्तींना म्हणाले की आम्ही जातो आमचा काळ झाला. सप्तसिंधू सप्त गंगा मुक्त करा हे त्यांचे शेवटचे शब्द: होते. त्या भडव्या औरंग्याला गाडा, काशी विश्वेश्वर मुक्त करा,” असे ते म्हणाले होते, असे संभाजी भिडे म्हणाले आहेत.