• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Uddhav Thackeray Attacks The Government Before The Dussehra Gathering

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त

उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याआधी, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 01, 2025 | 08:34 PM
दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल (Photo Credit- X)

दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
  • IND vs PAK सामना पाहणारे देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त
  • शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी

मुंबई: आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून नवव्यांदा ट्रॉफी आपल्या नावावर केली. भारताच्या या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू असतानाच आता त्याचे राजकीय पडसादही उमटताना दिसत आहेत. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याआधी, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे. “ज्या लोकांनी हा सामना पाहिला, ते देशद्रोही आहेत,” असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर एक मोठी चर्चा सुरू केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या परिस्थितीत आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर देशात अनेक ठिकाणी विरोध सुरू झाला होता. त्यावेळी विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता आणि सामना रद्द करण्याची मागणी केली होती. शिवसेनेने या विरोधात सातत्याने आवाज उठवला होता. मात्र, केंद्र सरकारने नियमांचे कारण देत सामन्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी एक देशभक्त म्हणून तो सामना पाहिला नाही. जे लोक हा सामना पाहत होते, ते देशद्रोही आहेत. देशभक्ती फक्त खेळ पाहण्यापुरती मर्यादित असू शकत नाही. देशहिताच्या बाबींमध्ये जागरूक राहणे आणि योग्य वेळी सक्रिय असणे हीच खरी देशभक्ती आहे.”

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद | मातोश्री, मुंबई – #LIVE https://t.co/6Y32DHniUs — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 1, 2025

Shivsena Dasra Melava budget : “63 कोटी लागणार आहेत म्हणे….! ठाकरेंच्या दसऱ्याचा मेळाव्याचा भाजपने थेट मांडला हिशोब

राज्य सरकारवर गंभीर आरोप

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील पूर आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचाही उल्लेख केला आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “महाराष्ट्र सध्या भीषण पुराचा सामना करत आहे. मी राज्य सरकारला हात जोडून विनंती केली होती की, कोणत्याही राजकारणाशिवाय शेतकऱ्यांच्या मदतीला धावून या. मात्र, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे कोणतीही योजना दिसत नाही. ते सर्वजण फक्त आपल्या जाहिरात आणि ब्रँडिंगमध्ये व्यस्त आहेत. अजित पवार कोणत्याही गोष्टीचा भाग दिसत नाहीत आणि एकटे पडले आहेत.”

काही साखर कारखानदारांनी त्यांच्या कर्जात बुडालेल्या गिरण्या वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची विमा रक्कम घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. “जर भाजप या राजकीय नेत्यांना सुरक्षा देण्यास तयार असेल, तर आमच्या शेतकऱ्यांना का नाही? राज्य सरकार ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क का वसूल करत आहे? साखर संघांनीही आता याचा विरोध केला आहे,” असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली. ते म्हणाले, “जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते, तेव्हा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी मला पत्र लिहून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत आणि विशेष पॅकेजची मागणी केली होती. मी तेव्हा कृषी कर्जमाफी जाहीर केली होती, आता मुख्यमंत्रीही असेच करतील का?”

उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पथकाने अद्यापही पूरग्रस्त भागाचा दौरा न केल्याबद्दलही टीका केली. “आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी करतो. राज्य सरकारने ‘दुष्काळ’ आणि ‘नैसर्गिक आपत्ती’ यांसारख्या शब्दांचा खेळ थांबवून नुकसान झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल

Web Title: Uddhav thackeray attacks the government before the dussehra gathering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Eknath Shinde
  • IND VS PAK
  • Maharashtra Politics news
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

50 व्या वाढदिवसानिमित्त सुबोध भावेने घेतला कौतुकास्पद निर्णय, म्हणाला,”पुढचे 25 महिने महाराष्ट्रातील..”
1

50 व्या वाढदिवसानिमित्त सुबोध भावेने घेतला कौतुकास्पद निर्णय, म्हणाला,”पुढचे 25 महिने महाराष्ट्रातील..”

Ladki Bahin Yojana  : लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, म्हणाले…
2

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, म्हणाले…

हे नाही सुधारणार…पाकिस्तानच्या खेळाडूने उडवली हार्दिक पांड्याची खिल्ली! ट्रॉफी जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकला देखील डिवचले
3

हे नाही सुधारणार…पाकिस्तानच्या खेळाडूने उडवली हार्दिक पांड्याची खिल्ली! ट्रॉफी जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकला देखील डिवचले

Asia Cup 2025 Trophy Controversy : ICC ने उचलले मोठे पाऊल! ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आखली ‘ही’ योजना 
4

Asia Cup 2025 Trophy Controversy : ICC ने उचलले मोठे पाऊल! ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आखली ‘ही’ योजना 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल

हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल

Nov 13, 2025 | 09:50 AM
15 नोव्हेंबरपासून बदलणार Toll Plaza चे नियम, ‘ही’ चूक केल्यास भरावा लागेल ‘दुगना लगान’

15 नोव्हेंबरपासून बदलणार Toll Plaza चे नियम, ‘ही’ चूक केल्यास भरावा लागेल ‘दुगना लगान’

Nov 13, 2025 | 09:48 AM
व्हाईट हाऊसमध्ये विनोदातून राजकारण; तुमच्या किती बायका आहेत? Trump आणि Sharaa यांचा ‘तो’ VIDEO VIRAL

व्हाईट हाऊसमध्ये विनोदातून राजकारण; तुमच्या किती बायका आहेत? Trump आणि Sharaa यांचा ‘तो’ VIDEO VIRAL

Nov 13, 2025 | 09:42 AM
IND vs SA Test : पहिल्या कसोटीचा थरार कधी, कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्व लाईव्ह स्ट्रीमिंगचा तपशील

IND vs SA Test : पहिल्या कसोटीचा थरार कधी, कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्व लाईव्ह स्ट्रीमिंगचा तपशील

Nov 13, 2025 | 09:41 AM
Mumbai Crime: दुर्दैवी! मुंबईत उंच इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Mumbai Crime: दुर्दैवी! मुंबईत उंच इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Nov 13, 2025 | 09:33 AM
Winter Special : मुळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग नाश्त्याला बनवा खमंग पराठा; याची चव सर्वांनाच करेल खुश

Winter Special : मुळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग नाश्त्याला बनवा खमंग पराठा; याची चव सर्वांनाच करेल खुश

Nov 13, 2025 | 09:30 AM
Vastu Tips: भिंतीवर घड्याळ लावण्यापूर्वी वास्तूचे ‘हे’ नियम, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान

Vastu Tips: भिंतीवर घड्याळ लावण्यापूर्वी वास्तूचे ‘हे’ नियम, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान

Nov 13, 2025 | 09:23 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.