फोटो सौजन्य- pinterest
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो. यंदा ‘चातुर्मासाला’ शनिवार, २५ जुलै रोजी म्हणजेच आषाढी एकादशीपासून सुरुवात होत आहे. पुढील चार महिने म्हणजेच २० नोव्हेंबर (कार्तिकी प्रबोधनी एकादशी) पर्यंत हा काळ असेल. या चार महिन्यांच्या कालावधीला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. देवशयनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगिक निद्रेत जातात. परिणामी, विवाह, गृहप्रवेश, मुंडन विधी, नामकरण विधी आणि इतर शुभ समारंभ स्थगित केले जातात. या काळात नेमके काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि याचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया.
चातुर्मास म्हणजे ‘चार महिने’. हिंदू पंचांगानुसार, हा चार महिन्यांचा पवित्र काळ आहे (आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत). याला ‘चौमास’ असेही म्हणतात. या चार महिन्यांत भगवान विष्णू योगनिद्रेत (गाढ आध्यात्मिक निद्रा) जातात, त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्यक्रम (जसे की विवाह किंवा गृहप्रवेश) केले जात नाहीत.
पुजा, सत्संग, दान, यज्ज्ञ आदी गोष्टी तुम्ही चातुर्मासात करू शकता.
या महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे शुभ फळ देणारे ठरते.
चातुर्मासात सात्विक अन्न खावे. गरजूंना कपडे चातुर्मासात अवश्य करावेत.
लग्न, गृहप्रवेश, मुंडन आदी करणे या महिन्यांमध्ये टाळावे.
काळ्या रंगाचे कपडे चातुर्मासात घालू नये.
मोठ्यांचा अपमान या दिवसात करू नये.
धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. भगवान विष्णू हे शुभकार्यांचे संरक्षक मानले जात असल्याने त्यांच्या झोपेच्या वेळी ही कामे करणे योग्य मानले जाते. कारण, या काळात शुभ कर्माचे फळ मिळत नाही. याव्यतिरिक्त दुसरं कारण म्हणजे चातुर्मास पावसाळ्यात येत असल्याने या दिवसात हवामान दमट असते. या वातावरणात बैक्टेरिया अधिक असतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढतात. प्रवास करणे देखील कठीण होते. अशावेळी लग्नासारखी शुभ कार्य आयोजित करणे गैरसोयीचे ठरू शकते.
चातुर्मास केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर भारतीय संस्कृती आणि सणांच्या दृष्टिकोनातूनही खूप खास आहे.
श्रावण- भगवान शिव आणि विष्णू यांच्या उपासनेचा महिना.
भाद्रपद- श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी सारखे प्रमुख सण.
अश्विन – पितृ पक्ष, शारदीय नवरात्री आणि विजयादशमी.
कार्तिक – दिवाळी, देवोत्थान एकादशी आणि तुळशी विवाह.
या महिन्यांमध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी, दसरा आणि दिवाळी यांसारख्या प्रमुख सणांच्या आगमनामुळे सामाजिक आणि आर्थिक घडामोडींनाही गती मिळते.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: चातुर्मासाची सुरुवात २५ जुलै २०२६, आषाढी (देवशयनी) एकादशीपासून होणार असून २० नोव्हेंबर २०२६, कार्तिकी (प्रबोधिनीचातुर्मासाची सुरुवात २५ जुलै २०२६, आषाढी (देवशयनी) एकादशीपासून होणार असून २० नोव्हेंबर २०२६, कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशीपर्यंत हा पवित्र काळ असेल.) एकादशीपर्यंत हा पवित्र काळ असेल.
Ans: धार्मिक मान्यतेनुसार, या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे भक्त पूजा, जप, दान, व्रत आणि सत्संगाद्वारे आध्यात्मिक साधनेवर भर देतात.
Ans: पूजा, मंत्रजप, विष्णू उपासना, दानधर्म, सत्संग, धर्मग्रंथांचे वाचन, सूर्योदयापूर्वी स्नान आणि सात्त्विक आहार घेणे शुभ मानले जाते.






