फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये पंचक हा एक अत्यंत संवेदनशील आणि सावधगिरी बाळगण्याचा काळ मानला जातो. पंचक हा पाच दिवसांचा अशुभ कालावधी मानला जातो. त्यामुळे या काळामध्ये कोणतेही शुभ कार्ये केली जात नाही. द्रिक पंचांगानुसार, पंचकांची सुरुवात आज शुक्रवार, ३१ जुलैपासून होत आहे. आज सकाळी ६:३८ वाजता पंचक सुरू झाले आहे असून हे पंचक ४ ऑगस्टपर्यंत असणार आहे. आजच्या पंचकाला चोर पंचक म्हणतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, पंचकाचा अशुभ काळ चंद्राच्या संक्रमणाशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या पाच नक्षत्रांमधून संक्रमण करतो, तेव्हा पंचक काळ सुरू होतो. ही पाच नक्षत्रे कुंभ आणि मीन राशींमध्ये येतात. चोर पंचक अत्यंत धोकादायक मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार, चोर पंचकादरम्यान चोरी, आर्थिक नुकसान आणि व्यवसायाशी संबंधित हानी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे, चोर पंचकादरम्यान आपले घर, दुकान आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. चोर पंचकादरम्यान घाईघाईने केलेले आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यावसायिकांना या काळात कोणतेही मोठे व्यवहार काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो.
चोर पंचकाच्या काळात नवीन व्यवसायाची सुरुवात करणे टाळा. या काळात नवीन व्यवसाय सुरू केल्यास नफ्याऐवजी तोटा होऊ शकतो.
चोर पंचकाच्या काळात स्थावर मालमत्ता खरेदी करणे किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळा. या वेळी केलेल्या गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते.
या काळात दक्षिणेकडे प्रवास करणे टाळा. या दिशेने प्रवास केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. मान्यतेनुसार, पंचकाच्या काळात दक्षिणेकडे प्रवास केल्यास संकट ओढवू शकते. या दिशेने प्रवास केल्यास चोरी किंवा अपघात होऊ शकतो.
पंचक चालू असताना चुकूनही लग्न, गृहप्रवेश, मुंडन किंवा कोणतेही शुभ कार्य करू नका. या दिवशी केलेले शुभ विधी अशुभ मानले जातात.
चोर पंचकाच्या काळात लोखंडी वस्तू किंवा कपडे खरेदी करणे टाळा.
पंचकाच्या काळात पैशांचा व्यवहार करू नका.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चोर पंचक हा पंचकातील एक प्रकार मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या काळात काही शुभ कार्ये टाळण्याचा सल्ला दिला जातो.
Ans: गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, मौल्यवान वस्तूंची खरेदी, मोठे आर्थिक व्यवहार आणि काही शुभ कार्ये टाळावीत, अशी धार्मिक मान्यता आहे.
Ans: होय. या काळात देवपूजा, मंत्रजप, दान, नामस्मरण आणि इष्टदेवतेची उपासना करणे शुभ मानले जाते.






