फोटो सौजन्य- pinterest
प्रदोष व्रत दर महिन्याच्या त्रयोदशीला साजरे केले जाते. ज्या दिवशी हे व्रत असते त्या दिवशीच्या वाराला ते ओळखले जाते. यावेळी एप्रिल महिन्यातील प्रदोष व्रत बुधवारी येत असल्याने त्याला बुध प्रदोष व्रत म्हटले जाते. प्रत्येक दिवसाच्या बुध व्रताला वेगळे असे महत्त्व आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी खास उपाय करणे चांगले मानले जाते. जीवनामध्ये अपेक्षित यश मिळविण्यासाठी बुध प्रदोष व्रत पाळू शकतात.
बुध प्रदोष व्रत आज बुधवार, 15 एप्रिल रोजी आहे. या व्रताच्या दिवशी बुध ग्रहांशी संबंधित उपाय करणे खास मानले जाते. कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही काही खास उपाय करू शकता. बुध प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर ही एक गोष्ट अर्पण केल्यास आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. जाणून घेऊया उपाय
पंचांगानुसार, बुध प्रदोष व्रत बुधवार, 15 एप्रिल रोजी आहे. या दिवशी पूजेसाठी मुख्य प्रदोष काळ मुहूर्त सायंकाळी 6.47 ते रात्री 9.00 म्हणजे पूजेसाठी एकूण कालावधी 2 तास 14 मिनिटे आहे. काही पंचांगानुसार सायंकाळी 6.1 ते 7.31 (९० मिनिटे) असा आहे, जो शिव पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो.
बुध प्रदोष व्रताच्या दिवशी दोन शुभ योग आहेत. ब्रह्मयोग पहाटेपासून दुपारी 1.25 पर्यंत असेल, त्यानंतर इंद्रयोग तयार होतो. प्रदोष व्रताची पूजा इंद्रयोगाच्या काळात केली जाते. या दिवशी पूर्वा भाद्रपद नक्षत्र पहाटेपासून दुपारी 3.22 पर्यंत असेल, त्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असेल. प्रदोष व्रताच्या दिवशी पंचक लागू असेल, जे दिवसभर चालेल. भद्रा गुरुवार, 16 एप्रिल रोजी रात्री 10.31 ते पहाटे 5.55 पर्यंत आहे. ही भद्रा पृथ्वीवर आहे. या भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य टाळावे.
बुध प्रदोष व्रताच्या दिवशी बुध ग्रहांला मजबूत करण्यासाठी हे उपाय करू शकता. बुध ग्रहाला बुद्धी आणि व्यवसायाचे प्रतीक मानले जाते. तुम्ही बुधवारी शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण करू शकता. प्रदोष व्रताच्या वेळी प्रदोष काळात हा उपाय तुम्ही करू शकता. असे केल्याने जीवनात आर्थिक समस्या दूर होतील आणि नोकरी व्यवसायात प्रगती होईल.
शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण केल्याने व्यवसायाची वाढ वेगाने होते आणि अधिक नफा मिळतो. यामुळे तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढेल. शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जर एखाद्या मुलीला लग्नात अडथळे येत असतील, तर तिने हा उपाय करून पाहावा. शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हे व्रत भगवान शिवाला समर्पित असून प्रत्येक त्रयोदशी तिथीला सायंकाळी केला जातो.
Ans: भगवान शिव यांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते असे मानले जाते.
Ans: श्रद्धेने व्रत केल्यास नोकरीत प्रगती, पदोन्नती आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता वाढते.






