फोटो सौजन्य- pinterest
Jyotirlinga: ज्योतिर्लिंग म्हणजे काय? यामागील पौराणिक कथा जाणून घेऊया
या मंदिरात 22 पवित्र कुंड आहे. प्रत्येक कुंडाचे पाणी वेगवेगळ्या चवीचं आणि गुणधर्माचं आहे असं मानलं जातं. दर्शनापूर्वी या कुंडात स्नान करणे शुभ मानले जाते. मंदिराजवळील समुद्राला अग्नीतीर्थ असे मानले जाते. येथे स्नान केल्याने पाप नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. मंदिराची रचना पारंपरिक दक्षिण भारतीय अर्थातच द्रविड शैलीत असून उंच गोपुरम भव्य आहे. रामेश्वरामध्ये राम सेतू असल्याची देखील श्रद्धा आहे. येथून श्रीरामांनी लंकेकडे जाण्याचा मार्ग तयार केला होता. या ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा जाणून घेऊया
ही कथा आहे रामायणातील. रामायणानुसार राम यांनी लंकेच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी येथे भगवान शिवांची पूजा केली होती. श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर ब्राम्हण हत्या दोष दूर करण्यासाठी शिवपूजा करण्याचं ठरवलं. त्याने हनुमान यांना काशीहून शिवलिंग आणायला पाठवलं. पण वेळ निघून जात असल्यामुळे सीतेनेच वाळूचे शिवलिंग तयार केले. या शिवलिंगाची पूजा करून रामांनी दोष मुक्ती मिळविली.
हे शिवलिंग रामनाथ स्वामी ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झालं. हनुमान परत आल्यावरती त्यांना दुःख झालं की त्यांच्या आणलेल्या शिवलिंगाऐवजी दुसरं शिवलिंग पूजलं गेलं आहे. तेव्हा श्रीरामांनी त्यांना शांत करून सांगितलं की तू आणलेलं शिवलिंगही येथेच स्थापित केलं जाईल. म्हणूनच येथे दोन शिवलिंगाच महत्त्व सांगितलं जातं. एक शिवलिंग राम लिंग म्हणून ओळखलं जातं जे माता सीतेने वाळूपासून तयार केलं. तर दुसरं शिवलिंग हे हनुमान लिंग म्हणून ओळखलं जातं.
रामेश्वरम हे श्रद्धा, इतिहास आणि वास्तुकलेचा सुंदर असा संगम आहे. ज्योतिर्लिंगाला भेट दिल्यामुळे मनशांती आणि आध्यात्मिक समाधान मिळतं. शिवाय पापमोचन अशी देखील या ज्योतिर्लिंगाची ओळख आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: रामेश्वरम् मंदिर तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथे समुद्रकिनाऱ्याजवळ स्थित आहे.
Ans: या २२ पवित्र कुंडांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते; प्रत्येक कुंडाचे पाणी वेगळ्या गुणधर्माचे असल्याची श्रद्धा आहे.
Ans: हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून चारधाम यात्रेचा महत्त्वाचा भाग आहे; येथे दर्शनाने पापमोचन व मनःशांती मिळते अशी श्रद्धा आहे.






