काय घडलं नेमकं?
शबरून नेला अन्सारी (वय 25) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव सेराज अन्सारी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शबरुन हीचा सरोज अन्सारी याच्यासोबत दुसरा विवाह झाला होता. मात्र, लग्न झाले तरीही शबरून ही तिच्या पहिल्या पतीशी फोनवर वारंवार बोलत असे. या गोष्टीचा पती सेराज याला तीव्र राग होता. पहिल्या नवऱ्याशी होणाऱ्या या संभाषणावरून त्यांच्यात वाद होत होते.
साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली; 2 महिलांना अटक
रागाच्या भरात गळा आवळून संपवले आयुष्य
सोमवारी रात्रीच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने रागाच्या भरात सेराजने शबरूनचा गळा आवळून तिचे आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून आरोपी सेराज अन्सारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
Alibaug Crime: 36 तासांत चोरीचा उलगडा! रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला दुचाकीसह पकडलं
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खानाव (ता. अलिबाग) येथून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या ३६ तासांत शोधून काढत रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. खानाव येथील जितेश भास्कर पाटील (वय ३३) यांनी दि. १६ जुलै २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची TVS Ntorq 125 (क्रमांक MH-06-CS-8745) ही दुचाकी घराच्या अंगणात उभी केली होती. मात्र, दि. १७ जुलै रोजी पहाटे १.२८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली.
विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात
Ans: मुंबईतील ओशिवरा परिसरात.
Ans: पहिल्या पतीशी फोनवर बोलण्याच्या संशयातून.
Ans: आरोपी पतीला अटक करून गुन्हा दाखल केला.






