फोटो सौजन्य- pinterest
गुजरात, राजस्थान, उत्तर भारत आणि महाराष्ट्रामध्ये संतोषी मातेचे पूजन मोठ्या प्रमाणावर केले जाते, कारण ही देवी समाधान, शांतता आणि सुखाची देवता मानली जाते. संतोषी मातेची आराधना लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे.
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान गणपती आपल्या बहिणीकडून रक्षासूत्र बांधून घेत होते आणि भेटवस्तूची देवाणघेवाण सुरू होती. मग त्यांच्या मुलांनी गणेशजींना या विधीबद्दल विचारले. तेव्हा गणेश जी म्हणाले की हा धागा नाही तर रक्षासूत्र आशीर्वाद आणि भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक आहे. हे ऐकून शुभ-लाभ खूप उत्साही झाले आणि त्यांनी गणेशजींना सांगितले की त्यांनाही एक बहीण हवी आहे, जेणेकरुन त्यांनाही हा रक्षासूत्र कुणी बांधवा. शुभ-लाभची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान गणेशाने आपल्या शक्तींमधून एक ज्योत निर्माण केली आणि रिद्धि-सिद्धि या दोन्ही पत्नींच्या आत्म्यशक्तीच्या सामर्थ्याने त्याला एकत्र केलं. काही काळानंतर या ज्योतीने मुलीचे रूप घेतले, जिचे नाव संतोषी ठेवण्यात आले. तेव्हापासून ती मुलगी ‘संतोषी माता’ म्हणून ओळखली जाऊ लागली. संतोषी माता यांचा जन्म शुक्रवारी झाला असल्याने त्यांची पूजा आणि व्रत फक्त शुक्रवारीच केले जातात.
सलग १६ शुक्रवार संतोषी मातेचे व्रत करतात. अशी श्रद्धा आहे की, या व्रतामुळे दु:ख, दारिद्र्य नष्ट होते आणि घरात सुख-समृद्धी येते. संतोषी मातेला गणपतीची कन्या आणि महालक्ष्मीचे रूप मानले जाते. ती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ‘संतोष’ (समाधान) देणारी माता म्हणून पूजली जाते. भक्त आपल्या कुटुंबात शांती, मुलांचे आरोग्य आणि यशासाठी तिची पूजा करतात. संकटे दूर करण्यासाठी तिची आराधना केली जाते.
संतोषी मातेची पूजा पद्धत खूप साधी आहे. भक्तांनी गुळ आणि हरभरा यांचा प्रसाद अर्पण करून पूजा करावी, अशी प्रथा आहे. शुक्रवारी आवर्जून पूजा केली जाते.
१९७५ साली ‘जय संतोषी माँ’ प्रदर्शित झाले. एखादे चित्रपट श्रद्धाळू भक्तांच्या मनात भक्ती मोहर उमटवते याचे उत्तम उदाहरण आहे. यानंतर संपूर्ण देशभरात संतोषी मातेचे मंदिर उभारले गेले. सर्वत्र पूजाअर्चा सुरू झाली. तसेच या चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर, संतोषी माता लोकांच्या घराघरात पोहोचली, विशेषतः उत्तर भारत आणि गुजरातसारख्या प्रदेशात तिची भक्ती वाढली असे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर, भौतिक सुखासोबतच मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्यासाठी संतोषी मातेवर अपार श्रद्धा ठेवली जाते.
सर्वप्रथम संतोषी मातेची पूजा प्रामुख्याने राजस्थान (जोधपुर) मधील लाल सागर येथील प्राचीन मंदिरात होत होती. आता संपूर्ण भारतात शुक्रवारच्या दिवशी विशेष भक्तिभावाने केली जाते.
शुक्रवारी, ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर, देवी संतोषीचे ध्यान करत व्रताचा संकल्प करा. यानंतर, देवघरात ज्या ठिकाणी पूजा करणार असाल त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून पाटावर लाल रंगाचे कापड पसरून देवी संतोषीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा. कलशाची स्थापना करत विधिवत पद्धतीने माता संतोषीची पूजा करा. त्यानंतर, माता संतोषीला फुले, हार, सिंदूर, अक्षता अर्पण करा. नैवेद्य म्हणून भिजवलेली हरभरा डाळ, गूळ आणि केळी देवीला अर्पण करा. तुपाचा दिवा, धूप जाळत माता संतोषींची व्रत कथा, चालीसा, मंत्र इत्यादींचे पठण करून शेवटी आरती करा. शेवटी सर्वांना प्रसाद वाटून कलशातील पाणी संपूर्ण घरात शिंपडा. संतोषी मातेची पूजा अर्चा नवरात्रीच्या दिवसांत केली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मनोकामना पूर्ण व्हावी, घरात सुख-समृद्धी यावी आणि अडचणी दूर व्हाव्यात यासाठी हे व्रत केले जाते.
Ans: हे व्रत संयम, श्रद्धा आणि संतोष यांचा संदेश देते, तसेच जीवनात सकारात्मकता आण
Ans: आर्थिक समस्या कमी होणे, कौटुंबिक सुख वाढणे आणि मानसिक शांती मिळणे असे फायदे मानले जातात.






