दृष्ट लागावं असं वैभव असून देखील त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. शंकररावांनी ब्राम्हण भोजन घातलं दान धर्म केलं पण तरीही त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. शंकरराव दत्तगुरुंचे परमभक्त त्यांनी गाणगापूर गाठलं आणि दत्तगुरुंचं दर्शन घेतलं. पण तेच त्यांना काही केल्या फरक जाणवेना. शंकररावांना एकदा स्वप्नात दत्तगुरुंचा दृष्टांत झाला. दत्तगुरुंनी शंकररांना अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जाण्याचे सांगितलं. बरेच दिवस शंकरारावांना हेच एकच स्वप्नं पडत होतं. न राहून शेवटी शंकररावांनी पत्नीला बरोबर घेत अक्कलकोट गाठवलं. तिथे त्यांना सुंदराबाई भेटल्या. शंकरराव म्हणजे मला स्वामींची भेट घडवून द्या त्यावेळी सुंदराबाई म्हणाल्या मला तीन हजार रुपये द्यावे लागतील. तेव्हा शंकरराव म्हणाले मी तीन नाही दहा हजार देतो पण स्वामींची भेट घडवून द्या.
तेव्हा अक्कलकोटात स्वामी ध्यानस्त बसले होते. शंकरराव आल्याच कळताच स्वामी उठले आणि स्मशानभूमीतील एका थडग्यावर डोकं टेकवून ते निजले. तेव्हा सेवेकऱ्यांनी शंकररावांना सांगितलं की स्वामींनी तुमच्यावरचं मरण स्वत:वर घेतलं. त्यांनर स्वामी तिथून उठले आणि शंकररावांना घेऊन जवळच्या दर्ग्यात गेले. अक्कलकोट हे असं ठिकाण आहे जिथे हिंदू, मुस्लीम ऐक्य भावाने स्वामींच्या दर्शनास येत असत.
शंकररावांना घेऊन स्वामी दर्ग्यात गेले आणि तिथल्या फकीरांना शंकररावांनी जेऊ घातलं. शंकरराव तेव्हा मनातून समाधानी झाले. त्य़ांना झालेल्या ब्रह्मसमंध आजारावर स्वामींनी शंकररांना कडूनिंबाच्या पाल्याचं औषध दिलं. आता स्वामी वैद्य झाल्यावर कोणता आजार टिकणार होता. स्वामींनी शंकरावांना कडूनिंबाच्या पाल्याचा रस प्यायला दिला. हळूहळू शंकररावांनी तब्येत बरी व्हायला लागली. सुंदराबाईंना पैशांचा मोह होता त्यांनी शंकररावांकडे तीन हजार मागितले तेव्हा स्वानी म्हणाले सुंदराबाईंना पैशांची गरज नाही त्यापेक्षा मारुतीच्या मंदिराजवळ एक मठ बांध असं स्वामींनी शंकररांवांना सांगितलं. शंकररावांनी ती आज्ञा मान्य केली. अक्कलकोटात त्यांनी बांधलेलं भव्य मठ आजही आहे. कथेचा ताप्तर्य काय तर श्रीमंत असो किंवा गरीब असो वाट्य़ाला येणारे भोग कोणालाही चुकले नाही. पण जर तुम्ही तुमच्या गुरुंवर देवावर श्रद्धा ठेवलीत तर या भोगाची तीव्रता कमी होते,असं स्वामी सांगतात.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !






