फोटो सौजन्य - सोशल मीडिया
इतिहासात मराठा आणि मुघलांचा संघर्ष हा कित्येक पिढ्यांपिढ्या चालत आला आहे. ज्यात अकबर आणि प्रताप याच्यात झालेल्या हल्दीघाटीची गणना होते. अकबरची शक्तीशाली सेना आणि अनेक प्रलोभने असूनही महाराणा प्रताप त्यांच्यापुढे झुकले नाहीत. ते त्याच्या प्रलोभनांना बळी न पडता त्यांनी आपले साम्राज्य मुघलाच्या सत्तेत विलीन केले नाही. कारण त्यांना अकबरला आपला बादशाह मानणे मंजूर नव्हते.
जेव्हा अकबर महाराणा प्रताप यांना विलीनीकरणासाठी तयार करू शकला नाही. तेव्हा त्याने आमेरचे राजा मानसिंह याच्या नेतृत्वाखाली फौज पाठवून मेवाडवर ताबा मिळवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विशाल मुघल सैन्याशी लढण्यासाठी महाराणा प्रताप यांच्याकडे केवळ ३,००० घोडेस्वार आणि काही भिल्ल तिरंदाजांची फौज होती. याउलट मुघलाच्या सैन्यात १० हजार घोडेस्वार, काही हत्ती आणि तोफखाना होत्या. या दोन्ही सैन्यामध्ये ४ तास युद्ध चालले. परंतु, यावेळी युद्धात मुघल सैन्याचा विजय झाला.
एवढे होऊनही प्रताप यांनी हार मानली नाही. त्यांनी पुढील काही वर्षात आपली सेना मजबूत केली. स्वत:ला पुन्हा तयार केले. माजी सेनापती भामशाह यांच्या अर्थिक मदतीने आणि स्थानिक भिल्लांच्या सहकार्याने पुन्हा फौज उभी करून काही वर्षातच मेवाडच्या मोठ्या भागावर आपले शासन पुन्हा प्रस्थापित केले.
त्या काळात सिंधपासून माळवा आणि गुजरातपासून अजमेर आग्र्याला जाणारे व्यापारी मेवाडमधून जात होते. या लोकांची सुरक्षा मेवाडचे शासक आणि त्यांचे सैन्य करत असे. म्हणून या राज्याला त्या काळात अधिक महत्त्वाचे मानले जात होते.






