आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र(फोटो-सोशल मीडिया)
Aditya Thackeray’s letter to the central government : बीसीसीआयने आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 19 ऑगस्ट रोजी संघ जाहीर केला आहे. संगहचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे. तर उपकर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड केली गेली आहे. आशिया कप 2025 ला 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. तर, या स्पर्धेत 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आता या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण पेटले आहे. चाहते भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. अशातच आता आता याच संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे ठाकरेंनी दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर बीसीसीआयची भूमिका आणि राष्ट्रीय हितसंबंधांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
गेल्या दशकात, आपल्या देशाला आणि नागरिकांना पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना वारंवार सामोरे जावे लागले आहे आणि केंद्र सरकारने ते सतत सांगितले आहे. अलीकडेच, माननीय पंतप्रधानांनी असेही म्हटले आहे की लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. तरीही, दुर्दैवाने आणि निर्लज्जपणे, बीसीसीआय आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी एक संघ पाठवत आहे. बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा वर आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : क्रिकेट विश्वात होणार मोठा धामका! सौदी क्रिकेट फेडरेशन आणि अमेरिकन लीग आले एकत्र
Blood and Water cannot flow together, but for @BCCI blood and revenue can flow together.
I have written to Union Minister Shri Mansukh Mandaviya ji, asking for the Union Government’s intervention in BCCI shameful act of sending a team that will play cricket with pakistan.
The… pic.twitter.com/PysIuPtmJL
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 20, 2025
“गेल्या दशकात, आपल्या देशाला आणि नागरिकांना पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना वारंवार सामोरे जावे लागले आहे आणि केंद्र सरकारने ते सतत सांगितले आहे. अलीकडेच, माननीय पंतप्रधानांनी असेही म्हटले आहे की लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. तरीही, दुर्दैवाने आणि निर्लज्जपणे, बीसीसीआय आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी एक संघ पाठवत आहे. बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा वर आहे का? ते आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? ते पहलघाममध्ये झालेल्या हल्ल्याचा सामना करणाऱ्यांच्या सिंदूरपेक्षा वर आहे का?
भूतकाळात, मानवतेच्या भल्यासाठी असलेल्या कारणामुळे अनेक राष्ट्रांना खेळांमध्ये वेगळे केले गेले आहे. दहशतवाद हे असे एक कारण आहे जे आपल्या दोन्ही राष्ट्रांना शांततेत प्रगती करू देत नाही. तरीही, केवळ बीसीसीआयच्या आग्रहामुळे आणि पैशाच्या आणि जाहिरातींच्या उत्पन्नाच्या हव्यासामुळे ते आपल्या जवानांचे सिंदूर आणि जीवन नगण्य मानते.आम्ही पहलघामच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगत जगाला शिष्टमंडळे पाठवली. आता आपण जगात शिष्टमंडळे पाठवून आपण त्यांच्यासोबत क्रिकेट का खेळतो याचे समर्थन करू का?
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने भारतात हॉकी खेळण्यास नकार दिला आहे, तेव्हा बीसीसीआय स्वार्थासाठी पाकिस्तानशी खेळते हे खरोखरच लज्जास्पद कृत्य आहे.
मला आशा आहे की, आपण राजकारणाच्या वेगवेगळ्या बाजूंनी असलो तरी, आपण या विचारावर एकाच पानावर असू, जसे आपण ऑपरेशन सिंदूर दरम्यान माननीय पंतप्रधानांना पाठिंबा दिला होता.” असे आदित्य ठाकरेंनी या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा : IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक