भारतीय महिला क्रिकेट संघ (फोटो- सोशल मीडिया)
भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार
उद्यापासून सुरू होणार आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा
14 जून रोजी भारत अन् पाकिस्तान येणार आमनेसामने
Women’s Indian Cricket Team: उद्या म्हणजेच 12 जूनपासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. सुरुवातीचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. तर भारताचा संघ 14 जून रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान 14 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. दरम्यान यंदाचा वर्ल्डकप भारत जिंकण्याची प्रबळ कारणे जाणून घेऊयात.
फलंदाजी – भारतीय महिला संघ आपल्या आक्रमक आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. इंग्लंडमध्ये दोन्ही खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला आहे. जेमिमा रोड्रिग्स मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी ओळखली जाते. तर रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत.
रिचा घोष: रिचा घोष ही भारतीय फलंदाजीचा मुख्य कणा समजला जात आहे. कालच्या सराव सामन्यात देखील रिचा घोषने 68 रन्सची शानदार खेळी केली होती. टी 20 फॉर्मटमध्ये रिचा घोष अत्यंत आक्रमक खेळीसाठी ओळखली जाते.
IND Vs ENG: रिचा घोषची झुंजार खेळी व्यर्थ; अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा भारतावर 5 रन्सने विजय
गोलंदाजी: इंग्लंडमध्ये टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. इंग्लंडच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते. रेणुका सिंह, क्रांति गौड, नंदिनी शर्मा यांनी आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. नंदिनी शर्माने आपल्या डेब्यू मॅचमध्ये शानदार कामगिरी केली होती.
स्पिनर्स: भारतीय संघातील स्पिनर्स गोलंदाजी देखील अत्यंत प्रभावी अशी ठरली आहे. श्री चरणी आणि राधा यादव यांनी आपल्या फिरकीने फलंदाजांना अनेकदा अडचणीत आणले आहे. तसेच श्रेयांका पाटील देखील चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्यामुळे आता सर्व बाजूने भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे. या कारणांमुळे भारतीय संघ यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार समजला जात आहे.
इंग्लंडचा भारतावर 5 रन्सने विजय
वर्ल्ड कप सुरू होण्याआधी भारताने आज इंग्लंडविरुद्ध अपला दूसरा सराव सामना खेळला. मात्र या सामन्यात भारताला 5 रन्सने पराभव स्वीकारावा लागला आहे. हा शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडच्या बाजूने झुकला. रिचा घोषने शानदार खेळी केली. मात्र तिची 68 रन्सची खेळी व्यर्थ गेली. तिची ही खेळी भारताला विजयापर्यन्त नेण्यास अपयशी ठरली.
ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने
इंग्लंडच्या सांगणे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने 6 विकेट्स गामावत 20 ओव्हर्समध्ये 171 रन्स केल्या. एमी जोन्सने शानदार 64 रन्सची खेळी केली. तर कर्णधार साईवर ब्रट 57 रन्सने महत्वाचे योगदान दिले. डैनी गिब्सनने 30 रन्सकर संघाला 171 रन्सपर्यन्त पोहोचवले. भारताकडून श्रेयांका पाटीलने 2 विकेट्स घेतल्या. शेफाली वर्मा, रेणुका सिंह, राधा यादव, श्री चरणी यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.






