ऋषभ पंत(फोटो-सोशल मिडिया)
IPL २०२५ : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) ने सर्वाधिक बोली लावून २७कोटी रुपयांना खरेदी केले. पंत या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू बनून आयपीएल लिलावात चर्चेत आला. केएल राहुलच्या जाण्यानंतर, एलएसजीला निश्चितच एका अनुभवी फलंदाजाची आणि एका हुशार कर्णधाराची आवश्यकता होती. पंतमध्ये हे दोन्ही गुण होते, एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांनी तर त्याच्यामध्ये आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधारर होण्याची क्षमता असल्याचे वर्णन केले.
२०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये नेणारा कर्णधारही पंतच होता. म्हणूनच एलएसजीला त्याच्यामध्ये पहिला विजेतेपद जिंकू शकणारा कर्णधार दिसला आणि फ्रँचायझीने त्याला २७ कोटी रुपयांना विकत घेतले, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक किमत आहे. तथापि, जर आपण या हंगामात पंतच्या आतापर्यंतच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोललो तर ते निराशाजनक आहे. सर्वात महागडा खेळाडू असूनही, तो ६ सामन्यांमध्ये फक्त १०३ धावा करू शकला, अशा प्रकारे, आतापर्यंतच्या सामन्यांनंतर, पंतव्या एका धावेमुळे एलएसजीला २६.२१ लाख रुपये खर्च आले आहेत. तथापि, जर आपण संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर, त्याच्या नेतृत्वाखाली एलएसजीने ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत.
हेही वाचा : IND VS BAN : भारत जाणार बांगलादेश दौऱ्यावर, एकदिवसीयसोबतच रंगणार टी-२० सामने..