डिके शिवकुमार यांची आयपीएलवर नाराजी? (फोटो- सोशल मीडिया))
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार झाले नाराज
आयपीएलच्या आयोजकांवर व्यक्त केली नाराजी
RCB Win IPL 2026 Trophy Updates: काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये आयपीएल 2026 चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने आयपीएल ट्रॉफीवर सलग दुसऱ्यांदा आपले नाव कोरले आहे. आरसीबीचे चाहते आनंद साजरा करत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी मात्र आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
आरसीबीने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सकहा 5 विकेट्सने पराभव केला आहे. विराट कोहलीच्या नॉट आउट 75 रन्सच्या खेळीमुळे आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. या विजयानंतर कर्नाटकसह संपूर्ण देशातील RCB चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच डी.के. शिवकुमार यांनी आयोजकांवर नाराजी व्यक्त केली आहे.
Tonight, Bengaluru rises again as champions! ಈ ಸಲವೂ ಕಪ್ ನಮ್ದೇ ⭐️⭐️ RCB has created history by clinching a second consecutive IPL title. With grit, composure, and the heart of true champions, the team has once again made Bengaluru proud. Congratulations to the players,… pic.twitter.com/y2hgXT4m2l — DK Shivakumar (@DKShivakumar) May 31, 2026
आयपीएलचा अंतिम सामना बंगळुरूमध्ये होणे अपेक्षित होते. परंतु राजकारणामुळे हा सामना गुजरातला हलवण्यात आला. आमच्यावर अन्याय झाला आहे,” असे खळबळजनक विधान डिके शिवकुमार यांनी केले. डिके शिवकुमार यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी देखील आरसीबीच्या विजयावर आनंद देखील व्यक्त केला आहे. यांच्या मुलांनी इतिहास रचला आहे. त्यांनी कर्नाटकची मान अभिमानाने उंचावली आहे, असे कौतुक त्यांनी केले आहे.
रजत पाटीदार IPL च्या इतिहासात ‘ही’ कमाल करणारा पहिला कॅप्टन
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफी आपल्याकडेच ठेवली आहे आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. २०२५ मध्ये पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या आरसीबीला आपले दुसरे विजेतेपद पटकावण्यासाठी जास्त वाट पाहावी लागली नाही, त्यांनी एका वर्षाच्या आतच दुसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवले. यासह, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने एक असा पराक्रम केला, जो आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही कर्णधाराने केला नव्हता. १८ वर्षात पहिल्यांंदाच रजत पाटीदारने मागच्या वर्षी बंगळुरूला हा आनंद मिळवून दिला होता आणि सलग दुसऱ्या वर्षीही या कर्णधाराने आपला मान राखला.
कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात ट्रॉफी जिंकणारा रजत पाटीदार पहिला खेळाडू ठरला. २०२५ च्या आयपीएल हंगामापूर्वी जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने रजत पाटीदारला आपला कर्णधार म्हणून नियुक्त केले, तेव्हा तो संघाला पहिल्याच हंगामात विजय मिळवून देईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. रजत पाटीदारने सर्व टीकाकारांना खोटे ठरवत, संघाला उत्कृष्ट आणि यशस्वीपणे विजयाकडे नेले. आयपीएल २०२६ च्या हंगामात, आरसीबीने गतविजेत्या संघाप्रमाणे मैदानावर कामगिरी केली आणि सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावली.






