मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले (Photo Credit- X)
मालेगावचे एमआयएम आमदार मुफ्ती इस्माइल यांनी या मुद्द्यावरून सरकार आणि निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “प्रत्येक क्षेत्रात मुस्लिमांना डावलले जात आहे. आता टीम इंडियामध्येही खेळाडूंना त्यांच्या धर्मामुळे संधी दिली जात नसल्याचे चित्र आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा जो पराभव झाला, त्याला हे भेदभावाचे राजकारणही कारणीभूत असू शकते.”
Mumbai, Maharashtra: AIMIM MLA Mufti Ismail Qasmi says, “It is being said that talented players from the Muslim community are being sidelined. Muslim players are being kept out of the team. As a result, the team recently lost. The reason, it is claimed, is that capable Muslim… pic.twitter.com/PTeKtp0pPl — IANS (@ians_india) February 24, 2026
यानंतर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनीही या सुरात सूर मिसळला. “भाजपच्या राजवटीत अनेक क्षेत्रांत मुस्लिमांसोबत भेदभाव होत आहे. जर क्रिकेटसारख्या खेळातही धर्माच्या आधारावर खेळाडूंची निवड होत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. केवळ मुस्लिम असल्यामुळेच शमी आणि सिराज यांना संघाबाहेर ठेवले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे खळबळजनक आरोप आझमी यांनी केले आहेत.
या वादग्रस्त विधानांनंतर राजकीय वातावरण तापले असून इतर पक्षांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे (NCP) आमदार इदरीस नाईकवडी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “खेळामध्ये धर्माला आणणे पूर्णपणे चुकीचे आहे. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, मन्सूर अली खान पटौदी यांसारखे अनेक दिग्गज मुस्लिम खेळाडू भारतीय संघाचे कर्णधार राहिले आहेत. खेळाडूंची निवड ही त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते, धर्मावर नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते अमीन पटेल यांनीही या विधानांपासून अंतर राखले आहे. त्यांनी हे वक्तव्य बेजबाबदार असल्याचे सांगत, खेळाडूंची निवड ही केवळ त्यांच्या गुणवत्तेवर आणि परिस्थितीनुसार होत असल्याचे म्हटले.
राज्य सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी एमआयएम आणि सपा नेत्यांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. “हिंदू-मुस्लिम राजकारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी केवळ कौशल्य लागते, धर्म नाही. असे विधान करणाऱ्या नेत्यांनी देशाची माफी मागायला हवी,” असे गोगावले म्हणाले. तर युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी देखील टीका करताना म्हटले की, “भारतात सर्वोच्च पदांवर मुस्लिम व्यक्ती विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची खालच्या पातळीवरील राजकारण करणे चुकीचे आहे.”
‘वंदे मातरम’ला विरोध अन् Mangal Prabhat Lodha अबू आझमींविरुद्ध आक्रमक; दिले थेट ‘हे’ आव्हान






