आरसीबीविरुद्ध हार्दिक पंड्या खेळणार? (फोटो- ians)
आरसीबीविरुद्ध हार्दिक खेळण्याची शक्यता कमी
मुंबई मॅनेजमेंट हार्दिकवर नाराज असल्याची चर्चा
10 मे ला मुंबई विरुद्ध आरसीबी रंगणार सामना
MI Vs RCB Latest Updates: आयपीएल 2026 मध्ये यंदा मुंबई इंडियन्सची कामगिरी साजेशी राहिलेली नाही आतापर्यंत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 10 पैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सध्या मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफ मध्ये जाण्याचा प्रवास खडतर झाला आहे. उर्वरित सामने जिंकून देखील मुंबई प्ले ऑफ मध्ये जाईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यातच आता 10 मे ला होणाऱ्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्याने मागील सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यावेळेस सूर्यकुमार यादवने मुंबईचे नेतृत्व सांभाळले होते. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. हार्दिक अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
मुंबई इंडियन्स प्ले ऑफला जाऊ शकणार?
मुंबई इंडियन्स आतापर्यंत 10 सामने खेळला आहे. त्यापैकी मुंबईने 3 च सामने जिंकले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ नवव्या स्थानी आहे. मात्र मुंबई अजूनही प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. बाद फेरीत पोहोचण्यासाठी मुंबईला उर्वरित सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे 10 मे ला आरसीबीविरुद्ध मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळताना दिसून येणार आहे.
कितीही पराभव झाले तरी Hardik Pandya च कर्णधार? MI मॅनेजमेंटचा ‘हा’ मोठा निर्णय
कितीही पराभव झाले तरी Hardik Pandya च कर्णधार?
लागोपाठच्या पराभवांमुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, आता सर्वांच्या नजरा कर्णधार हार्दिक पांड्याच्या भवितव्यावर लागल्या होत्या. मात्र मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्याच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे समजते आहे. गेल्या काही सामन्यांतील पराभवानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी जोर धरत होती. मात्र मॅनेजमेंट बदल करण्यापेक्षा स्थिरता ठेवण्याला प्राधान्य दिल्याचे समजते आहे.
Vaibhav Suryvanshi वरून राजस्थान रॉयल्स गोत्यात? 18 वर्षांपेक्षा कमी वय अन्…; काय सांगतो कायदा?
2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतले. ते कर्णधारपद हार्दिक पंड्याला सोपवण्यात आले. रोहित शर्मासारख्या यशस्वी कर्णधाराला बाजूला सारून घेतलेला हा निर्णय चाहत्यांच्या पचनी पडला नव्हता. हार्दिक पंड्या आणि मुंबईच्या मॅनेजमेंटला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 2024 पासून 2026 पर्यंत मुंबईला विजेतेपद पटकवता आलेले नाही. मुंबईचा संघ अजूनही संघर्ष करतानाच दिसून येत आहे.






