हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात (फोटो - सोशल मिडिया)
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईचे सलग 5 पराभव
मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानी
कर्णधारपद पुन्हा रोहितकडे जाण्याची शक्यता
Ambani on Mumbai Indians IPL 2026: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात यंदाच्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा सलग पराभव होत आहे. यंदाच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स केवळ 2 सामने जिंकली आहे. 7 पैकी 2 सामने जिंकलेली मुंबई इंडियन्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानी आहे. निम्मी स्पर्धा संपत आली आहे. त्यामुळे पुढील सर्व सामने जिंकणे मुंबईला अनिवार्य असेल. त्यातच आता हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात आले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आयपीएल 2026 च्या हंगामात पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मिळालेल्या 103 धावांच्या ऐतिहासिक आणि लाजीरवाण्या पराभवानंतर आता कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
रोहित शर्माच्या नावाची पुन्हा चर्चा
हार्दिक पांड्याच्या जागी पुन्हा एकदा ‘हिटमॅन’ रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले जावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यामुळे संघात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी रोहित शर्मा हा उत्तम पर्याय असल्याचे मानले जात आहे. याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवच्या नावाचाही विचार होऊ शकतो.
Mumbai Indians चे वाभाडे निघताच हार्दिकवर आकाश अंबानी नाराज? ‘त्या’ कृतीचा Video Viral
हार्दिकवर आकाश अंबानी नाराज?
काल आयपीएलच्या हंगामातील सर्वात मोठा महामुकाबला वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झाला आहे. 2026 मध्ये प्ले ऑफ मध्ये जाण्याची शक्यता कमी होत चालली आहे. दरम्यान कालचा सामना हातातून गेला असे समजताच मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी स्टेडियम सोडले. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
IPL 2026 मध्य रोमांच निश्चित; किंग कोहली Vs प्रिन्स गिल! चिन्नास्वामीवर ‘विराट’ संघर्ष, पहा Playing 11
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा पुन्हा एकदा लाजिरवाणा पराभव झाला आणि या पराभवानंतर चक्क आकाश अंबानींचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. सामना संपण्याआधीच संतापलेले आकाश अंबानी डगआउट सोडून मैदानाबाहेर निघून गेल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे आता मुंबई इंडियन्सच्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मुंबई इंडियन्सचा मागील सामना एका निर्णायक वळणावर असताना हार्दिक सेनेने एकामागून एक चुका केल्या. खराब गोलंदाजीमुळे चेन्नईच्या संघाने 200 पेक्षा जास्त रन्स केल्या. त्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स केवळ 103 रन्स करू शकली. मुंबईचा पराभव होताना दिसत होता.






