MI Vs LSG Live Updates (फोटो- ians)
लखनौ विरुद्ध रोहित शर्मा खेळण्याचा अंदाज
मुंबई इंडियन्स रोहितवर सोपवला निर्णय
दुखापतीमुळे जवळपास 5 सामने रोहित दूर
Tata IPL 2026 MI Vs LSG Live Updates: आज आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी असलेले दोन संघ आपल्या अस्तित्वासाठी खेळणार आहेत. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौचा संघ आमनेसामने येणार आहे द्रमन आजच्या सामन्यात मुंबईकडून रोहित शर्मा खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्यात रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो एकही सामना खेळू शकलेला नाही. दुखापतीमुळे त्याला जवळपास 5 सामने खेळता आलेले नाहीत.दरम्यान आज लखनौविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा या सामन्यात खेळणार की नाही? आता यावर मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.
लखनौ आणि मुंबईचे संघ आता केवळ औपचारिकता म्हणून आयपीएलचे उर्वरित सामने खेळताना दिसून येणार आहेत. स्पर्धेचा शेवटचा टप्पा तरी चांगला व्हावा म्हणून दोन्ही संघ प्रयत्न करतील. मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असून तो लखनौविरुद्ध डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.
MI Vs LSG Pitch Report: आजची लढाई ‘अस्तित्वासाठी’; पहा वानखेडेचा स्पेशल पीच रीपोर्ट
रोहीत शर्मा आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. सध्या तो फिट असल्याचे समोर येत आहे. त्याने नेटमध्ये फलंदाजीचा सराव देखील केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आज खेळायचे की नाही हा निर्णय पूर्णपणे रोहित शर्मावर सोडला असल्याचे समजते आहे. त्यामुळे आज रोहित शर्मा खेळणार की नाही, हे टॉसच्या वेळेसच समजणार आहे.
Mohammed Siraj ने रचला इतिहास! IPL मध्ये रेकॉर्ड करणारा जगातील पहिला बॉलर ज्याने…
पीच रिपोर्ट
पॉईंट्स टेबलमध्ये हे दोन्ही संघ तळाला आहेत. मुंबई इंडियन्सचे होम ग्राऊंड असलेले वानखेडेचे पीच हे फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. येथील पीच हे लालमातीचे आहे. यामुळे बॉल चांगल्या पद्धतीने बॅटवर येतो. त्यामुळे या स्टेडियमवर आज रन्सचा पाऊस पडू शकतो.सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. सामना सुरू होऊन काही वेळ झाला की, स्पिनर्सना मदत मिळू शकते. रात्रीचया वेळेस या ठिकाणी दव पडू शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय कर्णधार घेण्याची शक्यता आहे.






