रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान पाऊस आल्यास, ३१ मे रोजी सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. सतत पाऊस पडत राहिल्यास, षटकांची संख्या कमी केली जाईल. पाऊस सुरूच राहिल्यास, अतिरिक्त १२० मिनिटे जोडली जातील. सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी प्रत्येक डावात किमान पाच षटके खेळवली जातील. जर सामना तरीही सुरू झाला नाही, तर तो ३१ मे रोजी होणार नाही. अशा परिस्थितीत, सामना रिझर्व्ह डेला, म्हणजेच १ जून रोजी खेळवला जाईल. सामना राखीव दिवशी, म्हणजेच १ जून रोजी, पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही, तर तो सामना रद्द घोषित केला जाईल. अशा परिस्थितीत, गुणतालिकेतील चांगल्या स्थानामुळे आरसीबीला विजेतेपद मिळेल.
अहमदाबादमधील हवामान सामन्यासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान पावसाची कोणतीही शक्यता नाही. तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते, तर हलक्या वाऱ्यामुळे खेळाडूंना काहीसा दिलासा मिळू शकतो. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांना मदत करणारी मानली जाते. येथे चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येत असल्यामुळे मोठ्या धावा पाहायला मिळतात. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त बाऊन्स आणि स्विंगची मदत मिळू शकते. जसजसा सामना पुढे जातो, तसतसे फिरकी गोलंदाजांनाही काही प्रमाणात टर्न मिळतो. या मैदानावर IPL 2026 मध्ये पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १८५ ते १९८ दरम्यान राहिली आहे. त्यामुळे फायनलमध्येही मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुजरात टायटन्सचा अहमदाबादमधील घरच्या मैदानावरील रेकॉर्ड मजबूत राहिला आहे. दुसरीकडे, आरसीबीने देखील याच मैदानावर २०२५ मध्ये विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे दोन्ही संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहेत.






