वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (फोटो- सोशल मीडिया)
वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड कप 2027 मधून बाहेर होण्याची शक्यता
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव
2027 मध्ये आयसीसी ओडीआय वर्ल्ड कप
IND Vs WI: सध्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यामध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव झाला आहे. यामुळे वर्ल्ड कप 2027 मध्ये वेस्ट इंडिजचा प्रवेश खडतर झाला आहे. या पराभवामुळे वेस्ट इंडिजच्या थेट पात्रतेच्या आशांना मोठा धक्का बसला आहे
2027 मध्ये वर्ल्ड कप होणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी आतापासूनच लढाई सुरू झाली आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यासाठी ही मालिका महत्वाची असणार आहे. हिल्याच सामन्यात यजमान वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
श्रीलंका क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये वनडे सिरिज खेळवली जात आहे. श्रीलंकेचा संघ 303 रन्स केल्या होत्या. वेस्ट इंडिजडच्या संघाला 262 च रन्स करता आल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे वर्ल्ड कपमध्ये पात्र होण्यासाठी वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या संघाला मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…
पात्रतेचे गणित काय?
३१ मार्च 2027 पर्यन्त आयसीसी क्रमवारीत पहिल्या 8 संघाला वर्ल्ड कपमध्ये प्रवेश मिळणार आहे. सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार श्रीलंका 96 पॉईंट्स नुसार, ते 6 व्या स्थानावर आहेत. तर वेस्ट इंडिजचा संघ 10 व्या स्थानावर आहे. वर्ल्ड कपमध्ये परेश घेण्यासाठी वेस्ट इंडिजला टॉप 8 मध्ये येणे अपेक्षित आहे. 2023 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजचा संघ पात्र ठरू शकला नव्हता, त्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांना ही मालिका जिंकणे अत्यंत गरजेचे होते.
वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अॅम्बेसेडर रोहित शर्मा, आयसीसीच्या एका कार्यक्रमात एकदिवसीय विश्वचषकाबद्दल विचारले असता, त्याने स्पष्टपणे सांगितले. रोहित शर्मा म्हणाला, “मला माझ्या देशासाठी निश्चितच विश्वचषक जिंकायचा आहे. ते माझे नेहमीच स्वप्न राहिले आहे. मी ५० षटकांचा विश्वचषक पाहत मोठा झालो आणि त्यावेळी टी-२० विश्वचषक किंवा आयपीएलही नव्हता.
‘2027 चा विश्वचषक कारकिर्दीचा शेवट…’, एबी डिव्हिलियर्सचे Virat Kohli बद्दल खळबळजनक विधान
त्यावेळी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा कार्यक्रम होता, जो दर चार वर्षांनी आयोजित केला जात असे आणि आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. म्हणूनच, त्या ट्रॉफीला खूप महत्त्व होते आणि ती जिंकण्याची इच्छाही होती. मला खरोखरच ती ट्रॉफी हवी आहे हे खरे आहे, म्हणून मी ती जिंकण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन.”






