फोटो सौजन्य - सोशल मीडिया
छावा चित्रपट – आकाश चोप्रा : सध्या बॉलीवूडचा सिनेमा छावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. देशामध्ये बॉक्स ऑफिस हा सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिनेमा गृहांमध्ये गर्दी केली आहे. चार दिवसांमध्ये या सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता भारताची माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने आता छावा चित्रपटावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत हे त्याने त्याच्या सोशल मीडियावर लिहिले आहेत. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे आणि रश्मिका मंदना हिने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर, क्रिकेटरमधून समालोचक बनलेले आकाश चोप्रा यांनी विचारले आहे की शाळेत आपल्याला त्याच्याबद्दल का शिकवले जात नाही? याशिवाय, आकाश चोप्रा असेही विचारले आहे की अकबराच्या महानतेच्या कथा आम्हाला सांगितल्या गेल्या होत्या आणि औरंगजेब रोड खूप प्रसिद्ध आहे हे असं का आहे?
आकाश चोप्राने एX वर पोस्ट करत लिहिले आहे की, “आज छावा पाहिला. शौर्य, निस्वार्थता आणि कर्तव्यभावनेची एक अविश्वसनीय कहाणी. खरा प्रश्न – शाळेत आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल का शिकवले गेले नाही? त्यांचा कुठेही उल्लेख नाही. तथापि, आपण वाचले आहे की अकबर एक महान आणि न्यायी सम्राट होता आणि दिल्लीत औरंगजेब रोड नावाचा एक अतिशय प्रसिद्ध रस्ता देखील आहे हे का आणि कसे घडले?”
Watched Chhaava today. Incredible tale of bravery, selflessness and the sense of duty.
Genuine question—why were we not taught about Chattrapati Sambhaji Maharaj at all in school? Not even a mention anywhere!!!
We did learn though how Akbar was a great and fair emperor, and…— Aakash Chopra (@cricketaakash) February 17, 2025
‘छावा’ हा चित्रपट ‘छावा’ नावाच्या पुस्तकापासून प्रेरित आहे, ज्यामध्ये भारतातील महान योद्ध्यांपैकी एक असलेले छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी दाखवण्यात आली आहे. जरी हा चित्रपट त्यांच्या संपूर्ण आयुष्याची सखोल चर्चा करत नसला तरी, एका खऱ्या सैनिक म्हणून ‘स्वराज्य’प्रती त्यांची वचनबद्धता प्रतिबिंबित करणारे महत्त्वाचे क्षण अधोरेखित करतो. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह अक्षय खन्ना देखील आहेत, जो मुख्य प्रतिस्पर्धी म्हणजेच मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारतो. या चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेंटी आणि विनीत कुमार सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.