कोणत्याही समाजाला आरक्षण देताना इतरांच्या हक्कांना धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जाईल. ओबीसी, एससी, एसटी किंवा इतर सर्व घटकांना न्याय देण हेच सरकारचे धोरण आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
नागरिकांना सजग ठेवण्यासाठी आणि त्यांचे त्वरित संरक्षण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उल्लेखनीय जनजागृती मोहीम सुरू केली आहे, असे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला म्हणाल्या.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र शासन करत राहणार असल्याचे मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
विविध परंपरा, धर्म आणि विचारांना एकत्र येण्यासाठी एक जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. सध्या ही लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे, असे राहुल…
शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने, उमेदीने उभे करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्पांच्या सहज क्रियान्वयनाकरिता विस्तार करीत वेगवेगळे विभाग निर्माण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जातीयवादी कारस्थाने करत असतील तेव्हा मी देवाभाऊंच्या पाठीशी बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे उभा राहीन, असे पडळकर म्हणाले.
Maharashtra Government: राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या १ कोटी ४६ लाख हेक्टर क्षेत्रावरील सुमारे ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्सुर्फ सहभागाने झाला पाहिजे. त्यामुळेच या महोत्सवासाठी जनतेच्या सहभागातून बोधचिन्हाचे निवड करण्यात आली आहे.
संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र भक्कम भागिदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात १० ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. देशाला लागणाऱ्या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी ३० टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते.
नाबार्ड पायाभूत विकास सहाय्य व ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना यामधून गडचिरोली या आकांक्षी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक क्षमतेनुसार शासकीय जमिनीवर गोदामे उभारण्यात येत आहेत.
महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या कामगारांना चांगले राहणीमान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी कै. अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ सुरू केली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाजानी येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
आपल्याकडचे कायदे हे खूप सक्षम आहेत. मात्र त्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. यासाठी आग्रही भूमिका घेऊन सायबर कायद्यात सुधारणा केली पाहिजे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
Amazon News: राज्य शासन उद्योजकांना राज्यात उद्योग स्थापन करणे सहज व सोपे होण्यासाठी विविध योजनांवर काम करीत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात सहाय्यक प्राध्यापकांच्या हजारो पदे रिक्त असताना शासनाकडून केवळ तात्पुरते उपाय केले जात आहेत. ३ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार ३ हजार ५८० सहाय्यक प्राध्यापकांच्या जागांना मान्यता देण्यात आली होती.
इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या १० व्या स्थापना दिनानिमित्त भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावर चर्चा सत्राचे पोलीस मुख्यालय, कुलाबा येथे आयोजन करण्यात आले होते.
आंतराष्ट्रीय बांबू दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला. एवेळी या कार्यक्रमाचा समारोप 'महाराष्ट्र गीता'ने झाला. मात्र काही तांत्रिक कारणाने महाराष्ट्र गीत वाजू शकले नाही. तरी या कार्यक्रमाचा समारोप 'महाराष्ट्र गीता'ने झाला