संग्रहित फोटो
या ग्रामपंचायतींना निवडणुकांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निवडणुकांचीही तयारी आयोगाला करावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या, ५ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहेत, मात्र त्यानंतर दिनांक १० फेब्रुवारी रोजी बारावीच्या परीक्षा होत आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही लांबणार आहेत. तेथे प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
फेब्रुवारीमध्ये मुदत संपत असलेल्या बहुतांश ग्रामपंचायती मोठ्या लोकसंख्येच्या आहेत. त्यामुळे तेथे निवडणुकीसाठी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. तेथील ग्रामपंचायत अधिकारी किंवा पंचायत समितीतील विस्ताराधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नियुक्त्या मिळणार आहेत. सर्व परीक्षांचा हंगाम सुरू होईल. त्यामुळे मतदान केंद्रांसाठी शाळा, महाविद्यालये उपलब्ध होणार नाहीत. या स्थितीत परीक्षा संपल्यावर व पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका उरकाव्या लागणार आहेत. अन्यथा, पावसाळा संपेपर्यंत म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरशिवाय वेळ मिळणार नाही.
सर्वाधिक ग्रामपंचायती तासगाव तालुक्यात
फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या सर्वाधिक म्हणजे ३९ ग्रामपंचायती तासगाव तालुक्यात आहेत. त्या खालोखाल मिरजमध्ये १७, खानापुरात १३ ग्रामपंचायती आहेत. आणि वाळवा तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी २ ग्रामपंचायतींची मदत फेब्रवारीत संपत आहे.
अशा आहेत ग्रामपंचायती
मिरज १७, अप्पर सांगली – ९, जत – २९, कवठेमहांकाळ – ११, तासगाव ३९, खानापूर १३, आटपाडी – १०, पलूस – १४, कडेगाव – ९, शिराळा – २, वाळवा – २






