राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे कार्य आणि महायुती सरकारने केलेली विकासकामे अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करतील, असे विखे म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर दुटप्पी भूमिकेवरून टीका केली. बारामतीत माघार घेणारी आघाडी राहुरीत निवडणूक का लादतेय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक न लढण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दल विखेंनी त्यांचे मनापासून कौतुकही केले.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे कार्य आणि महायुती सरकारने केलेली विकासकामे अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करतील, असे विखे म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर दुटप्पी भूमिकेवरून टीका केली. बारामतीत माघार घेणारी आघाडी राहुरीत निवडणूक का लादतेय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक न लढण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दल विखेंनी त्यांचे मनापासून कौतुकही केले.






