महाराष्ट्र केसरी हा केवळ एक किताब नसून तो महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीगिरांचा सर्वोच्च सन्मान आहे. मात्र, सध्या कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषद यांच्यातील वादामुळे या किताबाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. एकाच वर्षात जर चार-चार ‘महाराष्ट्र केसरी’ होणार असतील, तर जनतेने आणि कुस्तीप्रेमींनी नक्की कुणावर विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उपस्थित केला आहे. याच मागणीसाठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासातील दिग्गज मल्ल यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी हा केवळ एक किताब नसून तो महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीगिरांचा सर्वोच्च सन्मान आहे. मात्र, सध्या कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषद यांच्यातील वादामुळे या किताबाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. एकाच वर्षात जर चार-चार ‘महाराष्ट्र केसरी’ होणार असतील, तर जनतेने आणि कुस्तीप्रेमींनी नक्की कुणावर विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उपस्थित केला आहे. याच मागणीसाठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासातील दिग्गज मल्ल यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते.






