फोटो सौजन्य सोशल मीडिया
हे लोक नोव्हेंबर २०२३ मधील एका हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते . पण त्याच वेळी इस्रायल कडून हल्ले सुरु असताना बचाव कार्य करणाऱ्या टीमला तिथपर्यंत पोहोचणे कठीण झाल्यामुळे त्यांच्या बॉड्या तिथेच राहिल्या . नंतर हल्ले थांबल्यानंतर जुलै २०२६ मध्ये तिथे उत्खनन सुरु झाले आणि त्यांचे मृतदेह एक एक करून बाहेर काढण्यात यश आले . आणि ऑगस्टच्या सुरवातीला हे उत्खनन पूर्ण झाले . आणि आज त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येत आहे .
मिळालेल्या अहवालानुसार त्या इस्रायलच्या हल्ल्यात एकूण ३०८ जणांचा मृत्यू झाला असा दावा करण्यात आला आहे . आणि त्या मृतदेहांपैकी फक्त ११२ मृतदेहांचे अवशेष आता सापडले आहेत . उर्वरित अजून अनेक जण बेपत्ता किंवा त्यांचे अवशेष सापडले नसल्याचे बोलले जात आहे .यामुळे गाझा मध्ये आज युद्ध सुरु झाल्यानंतरचा सर्वात मोठा सामूहिक अंत्यसंस्कार होणार आहे . यासाठी गाझा मध्ये युद्धात बचावलेले लोकं आपली सद्भावना आणि श्रद्धांजली द्यायला जमली आहेत . असे मिळेळलेल्या रिपोर्टवरून समजते .
या घटनेमुळे गाझामधील मानवी संकट पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. युद्धामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू, विस्थापन आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या विध्वंसामुळे मानवी हक्क संघटनांनी सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. या सामूहिक अंत्यसंस्कारामुळे युद्धाच्या मानवी किंमतीची पुन्हा एकदा जाणीव जगाला होणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि मदत संघटनांनी युद्धग्रस्त भागात मदत वाढविण्याची गरज अधोरेखित केली आहे. गाझातील नागरिक अजूनही अन्न, औषधे आणि सुरक्षित निवाऱ्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत होणारा हा सामूहिक अंत्यसंस्कार युद्धाच्या जखमा किती खोल आहेत, याची वेदनादायी आठवण करून देणारा ठरत आहे.






