World War 3 Alert: रशिया-युक्रेनपासून ते भारत-पाकिस्तानपर्यंत युद्धाचा वणवा; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World War 3 possibilities 2026 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जग उत्सवाच्या वातावरणात असताना ३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलावर अचानक लष्करी हल्ला केला. ‘ऑपरेशन ॲब्सोल्युट रिझोल्व्ह’ (Operation Absolute Resolve) अंतर्गत अमेरिकेने निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले आणि जागतिक संघर्षाची एक नवी ठिणगी पडली. आज केवळ व्हेनेझुएलाच नाही, तर गाझापासून युक्रेनपर्यंत आणि काँगोपासून सुदानपर्यंत संपूर्ण जग दारूगोळ्याच्या वासाने भरलेले आहे. परिस्थिती इतकी नाजूक आहे की, एका देशात पडलेली ठिणगी तिसऱ्या महायुद्धाचे रूप धारण करू शकते. या जागतिक महामरीत भारतही अपवाद राहिलेला नाही.
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाने आता भीषण रूप धारण केले आहे. रशियाने आतापर्यंत ११ लाखांहून अधिक सैनिक गमावले आहेत, तर युक्रेनच्या जीवितहानीचा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला आहे. नाटोच्या विस्तारामुळे चिडलेल्या रशियाने माघार घेण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, ७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धामुळे गाझा पट्टीत मानवी संहार सुरू आहे. गाझामधील ७८% इमारती उद्ध्वस्त झाल्या असून ७२,००० हून अधिक पॅलेस्टिनींना प्राण गमवावे लागले आहेत. हे दोन संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्यास कारणीभूत ठरत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CENTCOM: वेचून मारणार!Trump च्या आदेशानंतर अमेरिकेचा सीरियात सर्वात मोठा हवाई हल्ला; 70 पेक्षा जास्त दहशतवादी ठार
केवळ युरोपच नाही, तर आफ्रिकेत काँगो आणि रवांडा यांच्यातील वांशिक संघर्षाने ९ दशलक्ष लोकांना विस्थापित केले आहे. सुदानमध्ये सत्तेसाठी सुरू असलेल्या अंतर्गत युद्धामुळे दीड कोटी लोक बेघर झाले आहेत, जे सध्याचे जगातील सर्वात मोठे मानवतावादी संकट मानले जात आहे. तिकडे अमेरिकेने व्हेनेझुएलावर ताबा मिळवल्यानंतर आता कोलंबिया आणि ग्रीनलँडवरही दावा सांगितला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडमधील ‘पिटुफिक स्पेस बेस’च्या संरक्षणासाठी संपूर्ण बेटावर अमेरिकन नियंत्रण हवे असल्याचे जाहीर केले आहे, ज्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
ONE MORE EXAMPLE HOW FAR PM .@narendramodi Ji CAN FORSEE! Trump thought he can catch Bharat Off-guard. Pidiot doesn’t know Modi Ji was already prepared with a plan. RBI has cut US Treasury holdings below $200 BILLION, reducing exposure by over $50 BILLION in a yr, while… pic.twitter.com/Tn7ILMav1i — BhikuMhatre (@MumbaichaDon) January 10, 2026
credit : social media and Twitter
भारतानेही आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. ६ मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे की, हे केवळ एक ‘ट्रेलर’ होते. भारताने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई सुरूच राहील. यामुळे सीमेवर तणाव वाढला असून दोन्ही देशांचे सैन्य हाय अलर्टवर आहे.
परराष्ट्र व्यवहार तज्ञांच्या मते, युद्ध कुठेही झाले तरी त्याचा परिणाम तुमच्या घरापर्यंत पोहोचतो. रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची भीती आहे. तसेच, इस्रायल-इराण संघर्षा मुळे हवाई क्षेत्र (Airspace) वारंवार बंद केले जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही भारतीय हवाई क्षेत्र बंद असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली होती. जेव्हा आखाती देश त्यांचे हवाई क्षेत्र बंद करतात, तेव्हा भारताकडून युरोपला जाणारी विमाने लांबच्या मार्गाने जातात, ज्यामुळे विमानाची तिकिटे महाग होतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crew11: अंतराळात आणीबाणी! 25 वर्षांत पहिल्यांदाच NASAने अर्धवट सोडली मोहीम; अंतराळवीरांना तातडीने पृथ्वीवर आणले जाणार
जगाचे लक्ष आता चीन आणि तैवानवर आहे. अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेनंतर चीन तैवानवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले, तर जागतिक इलेक्ट्रॉनिक्स आणि चिप उत्पादन ठप्प होईल. इराणमधील अंतर्गत निदर्शने आणि ट्रम्प यांनी दिलेला लष्करी कारवाईचा इशारा यामुळे मध्य पूर्वेतील तेल विहिरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती आहे. थोडक्यात सांगायचे तर, जग एका अशा वळणावर उभे आहे जिथे शांतता केवळ एका धाग्यावर लटकलेली आहे.
Ans: भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी सुरू केलेली ही मोहीम आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तींना धडा शिकवणे हा याचा मुख्य हेतू आहे.
Ans: युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, पुरवठा साखळी विस्कळीत होते आणि शस्त्रास्त्रांच्या आयातीवर परिणाम होतो, ज्यामुळे महागाई वाढते.
Ans: इराण, इराक किंवा इस्रायलचे हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे विमानांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि तिकिटे महाग होतात.






