Hormuz Tension : 'व्यापारी जहाजांवरील हल्ले तातडीने थांबवा' ; होर्मुझबाबत भारताची कठोर भूमिका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Iran War : चीन-रशियाला मोठा धक्का? अमेरिकेने उडवला इराणमधील सर्वात महत्त्वाचा पूल
आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग सुरक्षित आणि निर्बंधविरहित सुरु करण्याची मागणी भारताने केली.परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, व्यापारी जहाजे आणि नागरिकांच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले तातडीने थांबवावेत. संबंधित देशांनी संवाद आणि राजनैतिक मार्गाने हा वाद सोडवावा, असे आवाहन भारताने केले आहे.
तसेच भारताने नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासातील प्रमुखांना बोलावूनही होर्मुझमधील हल्ल्यांचा अधिकृतपणे तीव्र निषेध केला. भारताने व्यापारी जहाजांवरील आणि भारतीयांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, हेही स्पष्ट केले.
अलीकडे होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये यूएईच्या अल-बाहिया आणि एमचटी मोम्बासा यांचा सामावेश असून यावर एकूण ४६ नाविक होते. ज्यामध्ये ३० भारतीय होते. यातील अल-बाहिया जहाजावरील १२ भारतीयांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी आहे. तर मोम्बासा जहाजावरील १८ भारतीयांपैकी ९ जण जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
मृत भारतीय नाविकांच्या कुटुंबीयांप्रती भारताने दु:ख व्यक्त केले असून जखमींच्या बरे होण्याची प्रार्थना केली आहे. तसेच यूएईमधील परिस्थितीवरही भारत सरकार बारकाईन लक्ष ठेवून आहे. जखमी भारतीयांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी यूएई सरकारच्या संपर्कात आहे.
यूएईकडून देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. युएईने या हल्ल्याला निर्लज्ज संबोधले आहे. सोमवारी (१३ जुलै) ओमानजवळील होर्मुझच्या दक्षिणेकडील मार्गावर हा हल्ला झाला होता. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली होती.
India is deeply concerned by the attacks on two vessels, MT Al Bahiyah and MT Mombasa, during their transit through the Strait of Hormuz today. Both the vessels were carrying 30 Indian seafarers, among their combined crew of 46. Of the 12 Indian nationals onboard MT Al Bahiyah,… pic.twitter.com/1ljmpNobfg — IANS (@ians_india) July 14, 2026






