Modi-Putin Friendship : मोदींसाठी काहीपण! भारताच्या सांगण्यावरुन पुतिन यांनी टळला युक्रेनवरील अणुहल्ला; पोलंडचा मोठा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बार्तोशेव्स्की यांच्या मते, २०२२ च्या अखेरीस रशिया युक्रेन युद्ध अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचले होौते. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनवर अण्वस्त्र वापरण्याचा विचार करत होते. मात्र, भारताशी संवाद साधल्यानंतर बिघडलेली परिस्थिती शांत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दाला पुतिन महत्त्व देतात आणि त्यामुळेच त्यांनी युक्रेनवरील अणु हल्ला टाळल्याचा दावा बार्तोशेव्स्की यांनी केला.
भारत आणि रशियाचे संबंध अनेक दशकांपासून आहे. सोव्हिएत संघाच्या काळात दोन्ही देशांमध्ये विश्वाचा नाते निर्माण झाले होते. त्यामुळे रशियाशी थेट संवाद साधण्याची क्षमता भारताकडे आहे, युद्ध थांबवण्यासाठीही भारत प्रभावी भूमिका निभावू शकतो असा दावा बार्तोशेव्स्की यांनी केला. त्यांनी पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेचे कौतुक केले.
त्यांनी म्हटले की, भारत संघर्षाऐवजी संवादावर भर देत आला आहे. उर्जा सुरक्षेचा वितार करत भारताने नेहमीच संतुलित परराष्ट्र धोरणा स्वीकारले, पोलंडची भूमिकाही अशीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, रशिया युक्रेन युद्धातही भारताने कोणा एकाच्या बाजूने न राहता दोन्ही देशांना शांतता आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश दिला.
सध्या पोलंडच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे इराणमधील संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा करत पाकिस्तान स्वत:ची भूमिका जगासमोर मांडत आहे, तर भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेत आहे. पण अशा परिस्थितीतही भारत महान न बनता केवळ आपला शांततेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आहे. परंतु सध्या बार्तोशेव्स्की यांच्या दाव्यावर भारत किंवा रशियाकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
US Tariff Threat : ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ डाव; रशियन तेल खरेदीवरुन भारत पुन्हा निशाण्यावर






