(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
हे देशातील पहिले राज्यव्यापी एनसीएमसी असून, याची रचना ही खास सवलतधारकांकरीता करण्यात आली आहे, यामुळे सुमारे 50 सवलत श्रेणी एकाच छताखाली येऊन पहिल्यांदाच डिजिटल देय माध्यमाचा भाग होतील. कोट्यावधी रूपयांची उलाढाल या उपक्रमा अंतर्गत होईल असा अंदाज असून यामुळे विखूरलेल्या कागदावर विसंबून सुविधा या सहज, आधार ने लिंक करून डिजिटल माध्यमाने प्रदान केल्या जातील- यामुळे योग्य लोकांपर्यंत, पारदर्शक पद्धतीने आणि परिणामकारकरित्या, प्रत्येक वेळी बसमध्ये चढल्यानंतर सुविधा मिळण्याची हमी मिळेल.
महाराष्ट्राचा शहरं, गावं आणि अगदी ग्रामीण भागातून , एमएसआरटीसीचा सुमारे 16,000 बसेस 13 कोटी प्रवाशांना दरमहिन्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात ज्यामुळे ही भारतातील सर्वात विस्तारीत आणि सामाजिक स्तरावर महत्वाची सार्वजनिक परिवहन प्रणाली आहे- आणि म्हणूनच हा उपक्रम राबविण्याकरीता योग्य आहे.
या उपक्रमांतर्गत वर्षाला किमान 70 लाख एनसीएमसी कार्डची निर्मीती केली जाईल, ज्यामध्ये कालांतराने 2 कोटी कार्डांपर्यंत वाढ केली जाईल, आणि त्यांचे सुमारे 3,000 अधिकृत रिटेल आऊटलेट्समध्ये तसेच प्रत्येक एमएसआरटीसी डेपो आणि बस स्टेशनवर देखील वितरण केले जाईल. रूपे प्रिपेड कार्डस आंतरिक पद्धतीने वापरता येणाऱ्या या कार्डमुळे टॅप करून पैसे भरण्याची सोय उपलब्ध असेल ज्यामुळे विविध परिवहन सुविधा उपलब्ध होऊ शकतील- यामुळे दैनंदिन परिवहन सोपे तर होईलच, पण खऱ्या अर्थाने कनेक्टेड राहाता येऊ शकेल.
महाराष्ट्राव्यतिरिक्त याला एक राष्ट्रीय महत्व देखील आहे. भारतात 150 राज्य रस्ते परिवहन सेवा आहेत ज्यांचा माध्यमाने शेकडो ते कोट्यावधी लोकांना सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात आणि यामुळे या सगळ्याकरीता हजारो कोटी रूपयांची उलाढाल होते. आज जे महाराष्ट्रात सुरू झाले आहे ते कदाचित उद्या संपूर्ण भारतात देखील राबविता येऊ शकेल. या उद्घानामुळे एराया लाईफ़स्पेसची विस्तारीत बांधिलकी दिसून येते- यामध्ये तंत्रज्ञान व्यासपिठचा माध्यमाने फ़क्त व्यवहार केला जाणार नसून लोकांना उत्तम सेवा प्रदान केली जाईल आणि या सगळ्याचा समाजावर दीर्घकालीन परिणाम होईल.






