सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपल्ब्ध झाली आहे. राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांसाठीच्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. जाणून घेऊया या भरतीसंबंधी सविस्तर माहिती.
पद आणि जागा
पद- तंत्रज्ञ- 3 ( यामध्ये वेगवेगळ्या पदांची विभागणी केली आहे)
एकूण जागा- 800
शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ-3 या पदाकरिता शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता :
तंत्रज्ञ- 3 मधील वेगवेगळ्या वेगवेगळ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी नमूद करण्यात आली आहे.
मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित विषयामध्ये ITI उत्तीर्ण.
NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक
पदनिहाय पात्रता ही जाहिरातीमध्ये सविस्तर नमूद केली आहे. सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
उमेदवारासाठीची वयोमर्यादा
या भरतीप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमदवाराचे वय हे 01.10.2024 रोजी किमान 18 वर्षापेक्षा कमी व कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच काही प्रवर्गांसाठी, दिव्यांग आणि इतर घटकांसाठी ही वयोमर्यादा शिथिलक्षम असणार आहे. जाहिरातीमध्ये याबद्दल सविस्तर माहिती नमूद केली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुरुवात ही 26 नोव्हेंबर 2024 ला झाली असून उमेदवार 26 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.
अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे
10 वीची गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रे
ITI च्या 4 सिमिस्टर ची गुणपत्रके
मागास प्रवर्गातून अर्ज करत असल्यास जात प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र.
वेतन
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला 34,555 ते 86,865 रुपये एवढे दरमहा वेतन मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची निवडीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार असून त्या परीक्षेतील गुणानुनसार तसेच तसेच जाहिरातीमध्ये नमूद सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अधीन राहून करण्यात येईल.
उमेदवारांची घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा ही मराठी आणि इंग्रजी भाषेत घेण्यात येईल.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
या भरतीप्रक्रियेची जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी ‘इथे’ लिंकवर क्लिक करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया एक उत्तम संधी असल्याने त्यांनी तात्काळ अर्ज प्रक्रिया पार पाडायची आहे.