'उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात'; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला (Photo Credit- X)
मुंबईत पत्रकारांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी पंतप्रधान निवासाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर तीव्र आक्षेप घेतला. नार्वेकर म्हणाले, “लोकशाहीत संसदेला सर्वोच्च मंदिराचा दर्जा देण्यात आला आहे. जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू असते, तेव्हा सर्व चर्चा आणि वादविवाद हे लोकहितासाठी सभागृहाच्या आतच झाले पाहिजेत. संसदेला सोडून रस्त्यावर जाऊन आंदोलन करणे आणि त्याला प्राथमिकता देणे लोकशाहीसाठी योग्य आहे का?”
Mumbai, Maharashtra: On the Congress staging a protest near the Prime Minister’s residence, State Legislative Assembly Speaker Rahul Narwekar says, “Expressing protest and opposition is every individual’s right, it is the opposition’s right. However, expressing that protest in a… pic.twitter.com/ZJBHIQL41u — IANS (@ians_india) July 22, 2026
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेत काळे कपडे घालून नोंदवलेल्या निषेधावर बोलताना नार्वेकर म्हणाले, “अस्वस्थता व्यक्त करणे किंवा विरोध दर्शवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, विरोधी पक्षाचाही तो अधिकार आहे. परंतु, तो विरोध घटनात्मक मार्गाने दर्शवणे अधिक महत्त्वाचे आहे. विरोध करणे जर तुमचा अधिकार असेल, तर तो जबाबदारीने मांडणे हे तुमचे कर्तव्य आहे. जे लोकप्रतिनिधी स्वतःच्या जबाबदाऱ्या समजत नाहीत, त्यांना जनताच त्यांची योग्य जागा दाखवून देईल.”
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना नार्वेकर म्हणाले, “रक्तदान हीच खरी मानवसेवा आहे. गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याचे हे पवित्र कार्य आहे. नागरिकांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन सेवेची ही परंपरा अधिक समृद्ध करावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
‘विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?’; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल






