त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा
Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
हा रस्ता औद्योगिक वसाहतीसाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, आज कंपन्या सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत कंपनी बसेस, दुचाकी आणि अवजड वाहने एकाच वेळी अडकून पडली. वाहतूक पोलिसांनी पायसात उभे राहून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, तरीही अंतर्गत रस्त्यांवरील दबावामुळे वाहतूक सुरळीत होण्यास कमालीचा वेळ लागला. पाऊस सुरू झाला की दरवेळी या रस्त्याची अशीच बिकट अवस्था होत असल्याने महापालिका आणि संबंधित प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सुरळीत वाहतुकीसाठी तोडगा काढावा, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर पावसाळ्यात चिखलामुळे वाहने घसरण्याची मालिका सलग सहाव्या वर्षीही सुरूच आहे. मंगळवारी (दि. २१) रिमझिम पावसामुळे मुंबई नाक्याकडून धुळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर वडाळा नाका ते द्वारका सिग्नलदरम्यान रस्ता अत्यंत निसरडा झाला. परिणामी, दिवसभरात ५० हून अधिक दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या. काही दुचाकीस्वार जखमी झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) आणि अग्निशमन दलाच्च्या पथकांना पाचारण करावे लागले. दोन्ही पथकांनी धाव घेत रस्ता धुऊन चिखल साफ केला, तर पोलिसांनी बॅरिकेडिंग करत वाहतूक वॉर्डनच्या मदतीने दुचाकीस्वारांना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन केले. द्वारका परिसरात सध्या ‘ग्रेड सेप्रेटर’चे काम सुरू असल्याने तेथील माती अवजड वाहनांच्या चाकांना लागून महामार्गावर पसरत आहे. त्यातच उड्डाणपुलावरून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे या मातीचा चिकट चिखल तयार होत आहे. तसेच वडाळा नाका ते द्वारका दरम्यानचा सर्व्हिस रोड खोदल्यामुळे तेथील मुरूम-माती रस्त्यावर येऊन दुचाकींची घसरगुंडी होत आहे.
हा रस्ता औद्योगिक वसाहतीसाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, आज कंपन्या सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत कंपनी बसेस, दुचाकी आणि अवजड वाहने एकाच वेळी अडकून पडली, वाहतूक पोलिसांनी पावसात उभे राहून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, तरीही अंतर्गत रस्त्यांवरील दबावामुळे वाहतूक सुरळीत होण्यास कमालीचा वेळ लागला. पाऊस सुरू झाला की दरवेळी या रस्त्याची अशीच बिकट अवस्था होत असल्याने मनपा तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सुरळीत वाहतुकीसाठी तोडगा काढावा, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.
Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय






