काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणारा तरुण अश्रुबा कांबळे हा रुई ढोकी गावचा रहिवाशी आहे, गेल्या 5 वर्षापासून धाराशिवमधील साई कला केंद्रातील नर्तिका आणि त्याच्यात अनैतिक प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनाला गेले होते. त्यावेळी देव दर्शनावरून परत येतांना मृत प्रियकराच्या बायकोचा फोन आला म्हणून नर्तिका आणि अश्रुबा यांच्या वाद झाला होता. त्यानंतर त्याने “मी आत्महत्या करतो” अशी धमकी देत तो निघून गेला. मात्र नर्तिकीने या धमकी कडे दुर्लक्ष केले. आणि काही वेळातच अश्रुबाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तिला माहिती मिळाली.
पसार झालेल्या रिक्षा चालकाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करून मृत व्यक्तीचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी, येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलीस तिची चौकशी करत आहे. या घटनेने धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वीही नर्तिकेसाठी युवकाने संपवले जीवन
दरम्यान यापूर्वीही नर्तिकेसाठी एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचे धक्कदायक प्रकार समोर आला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच एका नर्तकीच्या प्रेमात वेडे होते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे नर्तकीच्या घरासमोर कारमध्येच उपचारसपंचाने सोमवारी मध्यरात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या माजी उपसरपंचाचे नाव गोविंद जगन्नाथ बर्गे (34 वर्षे) असे आहे. तर नर्तिकीचा नाव पूजा देविदास गायकवाड (21 वर्षे) असे आहे.
Ans: देवदर्शनावरून परतताना प्रियसीसोबत किरकोळ वाद झाला, त्यातून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं.
Ans: अश्रुबा अंकुश कांबळे, वय 25 वर्षे
Ans: पंचनामा व पोस्टमार्टम करण्यात आले, महिला ताब्यात घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






