Nanded Crime: मध्यरात्री पत्नीवर तीन राऊंड गोळीबार, आरोपी पती फरार; कौटुंबिक वादाचं धक्कादायक रूप
काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या तरुणांची नावे मानव बंटी रतनानी (वय 14), कार्तिक विकी उधवानी (वय 14) आणि दिनेश विजय पंजवानी (वय 17) अशी आहेत. तिघेही अमळनेरच्या सिंधी कॉलनीमधील रहिवासी होती. 4.46 वाजता खदाणीत हे तिन्ही अलपवयीन मुले गेली होती. खदाणीत एक बेटासारखा उंचवटा असल्याने तिघे पाण्यातून चालत त्याच्यावर चढले. इकडच्या बाजूला एक फूट पाणी होते. त्यावेळी पाणी काढतांना एकाच पाय घसरला आणि त्याला वाचवायला दुसर्याने त्याचा हात धरला. मात्र तोही खाली जाऊ लागला म्हणून त्याने तिसऱ्याचा हात धरला मात्र तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. घडलेली घटना एका रिक्षावाल्याच्या नजरेस पडली. तो धावत खाली खदाणीजवळ पोहचला तोपर्यंत एकाने ११२ डायल केले.
तिन्ही मृतदेह ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच देवळी येथील व स्थानिक नागरिक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर देवळी येथील दीपक मोरे याने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टम आणि इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
गावात हळहळ
तिन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टम आणि इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक निकम , हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील, कॉन्स्टेबल गणेश पाटील यांनी पंचनामा केला. दिनेश हा प्रताप कॉलेजला 11 वी कॉमर्सला शिक्षण घेत होता. तर मानव हा पिबीए इंग्लिश मिडियम स्कूलला 9 वीमध्ये शिकत होता, त्याचे वडील हॉटेल कामगार आहेत. तर, कार्तिक देखील पीबीए स्कूलला 9 वी मध्ये शिकत होता, त्याचे वडील बेकरीत काम करतात. या तुम्ही मुलांच्या मृत्यूने अमळनेरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांचे आवाहन
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नाले,तलाव, खदान भरलेले असतात पाण्याचे अंदाज येत नाही. त्यामुळे लहान मुलांनी आणि पोहता न येणाऱ्या नागरिकांनी अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.
दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
Ans: खदानीत सेल्फी काढताना एका मुलाचा पाय घसरला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही खोल पाण्यात बुडाले.
Ans: तिघा अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला.
Ans: पावसाळ्यात खदानी, तलाव आणि इतर खोल पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे व सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नये.






