gun firing (फोटो सौजन्य- pinterest )
मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यात एका बांधकाम व्यावसायिकांवर गोळीबार झाला. ही घटना रात्री बुधवारी घडली असूनचेंबूर येथे डायमंड गार्डनच्या सिग्नलवर हा गोळीबार झाला. सदरुद्दीन खान असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीच नाव आहे.
आत्महत्या: आजी, नातवाचा मृत्यू; इमारतीच्या गच्चीवरून मारली उडी
सदरुद्दीन खान हे पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत. गोळीबाराच्या वेळी गाडीत सदरुद्दीन आणि त्यांचा चालक बसलेला होता. भरवस्तीत रात्री 9.30 च्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सायन-पनवेल महामार्गावरून सदरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना डायमंड सिंगल येथे त्यांच्या गोळीबार झाला.
गोळीबारात जखमी झालेल्या सदरुद्दीन खान यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.सदरुद्दीन खान यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक गोळी सदरुद्दीन खान यांच्या दाढेत अडकली. झेन रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सदरुद्दीन खान यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले. मध्यरात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन दाढेतून गोळी काढण्याचं ऑपरेशन सुरु होतं.
नेमकं काय घडलं?
गोळीबार करणारे दोन हल्लेखोर बाईकवरुन आले होते. त्यांनी जवळून गोळीबार करुन ते पसार झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके स्थापन करण्यात केली आहेत असं पोलिसांनी सांगितलं. चेंबूर पोलिसांनी मध्यरात्री फायरिंग झालेल्या ठिकाणी पंचनामा केला. सदरुद्दीन खान यांच्यावर ज्या गाडीत फायरिंग झाली, त्या वाहनाचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. डायमंड गार्डनच्या सिग्नलवर फायरिंगची घटना घडली. यावेळी गाडीत सदरुद्दीन खान आणि त्यांचा चालक बसलेला होता. फायरिंग झाल्यानंतर चालकाने घाबरून पुढे एक किलोमीटर पर्यंत गाडी पळवली.
‘पोलिस करताय काय?’
खासदार वर्षा गायकवाड यांनी हल्ल्याच्या या घटनेवरुन सरकारवर टीका केली आहे. “साडे नऊला भर वस्तीत हल्ला होतो. अभिनेते सुरक्षित नाही, सैफ अली खान असेल भायखळ्यात खून असेल, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण असेल, पोलिस करताय काय?” असा सवाल त्यांनी केला.
“गृह विभागाला नवा गृहमंत्री द्या ही माझी मागणी आहे. मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे त्याला जबाबदार मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत. मुंबई पोलिसांची स्कॉटलंडच्या पोलिसांशी तुलना केली जाते आणि भर वस्तीत गोळीबार होतो, पोलिसांकडे याची माहिती नव्हती का?” असे प्रश्न वर्षा गायकवाड यांनी विचारले आहेत.