नेमकं प्रकरण काय?
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रशांत (३५ वर्षीय) असे आहे. तर आरोपी पत्नीचे नाव संध्या असे आहे. प्रशांत हा आखाती देशातून परत भारतात आला होता. तिथं तो कामाच्या निमित्ताने गेला होता. आखाती देशातून परत आल्यानंतर त्याला संध्याच्या अफेअरबद्दल कळले आणि त्यांच्यात भांडणे सुरू झाली. त्यावेळी संध्या आणि तिचा प्रियकर अनिल यांनी हत्येचा कट रचला. यामध्ये अनिलचा मित्र देखील सामील होता. काटानुसार साईने 29 जून रोजी प्रशांतला दारू पाजली आणि त्यानंतर त्याला एका इमारतीच्या गच्चीवर नेलं, जिथं संध्याच्या फोनवरील सूचनेनुसार त्याला खाली फेकलं. तिथं त्याचा जीव गेला नाही. यामुळे त्यांचा पहिला प्रयत्न फसला.
दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी
प्रशांतला वैधकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे संध्या आणि साई यांनी त्याला घरी आणण्यापूर्वी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये फिरवलं. प्रशांतला कसं संपवायचं? याचा विचार सुरू असताना त्याला रुग्णालयातच संपवण्याचा कट अनिलने रचला. संध्या नर्स असल्याने तिला बऱ्याच गोष्टी माहित होत्या. प्रशांतला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना संध्याने कथितरित्या कॅन्युलाद्वारे टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध सलाईनच्या माध्यमातून दिले. यात प्रशांतचा मृत्यू झाला. या दुसऱ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले. मात्र हे पोलिसांपासून जास्त काळ लपून राहील नाही.
तिघेही अटकेत
पोलिसांनी सखोल तपास करत पत्नी संध्या आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. त्यांची कठोर चौकशी करण्यात आली तेव्हा व्यंकट साईनेही पहिल्या खुनाच्या प्रयत्नात आपली भूमिका स्वीकारली आहे. तर चौकशीदरम्यान आरोपींनी नंतर गुन्हा कबूल केला. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, जिथं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या पोलीस संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.






