फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणाले खा. अमोल कोल्हे?
खासदार अमोल कोल्हे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले‘ या मालिकेचे निर्माते तसेच मुख्य अभिनेते आहेत. मालिका अवघ्या चार ते पाच महिन्यात बंद होणार असल्यामुळे प्रेक्षकांकडून नाराजी वर्तवली जात आहे. अशामध्ये अमोल कोल्हेंनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अमोल कोल्हे सोशल मीडियावर म्हणतात की, “१४ जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. मला आता माध्यम माहित नाही, पैसा कसा उभा राहील हेही माहित नाही. मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की, जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं काम महाराष्ट्राने केलंय. आणि हा महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल, तर त्याची वैचारिक बैठक पुन्हा एकदा मजबूत करावी लागेल. त्यामध्ये खारीचा वाटा का होईना, जर या माध्यमातून उचलला जात असेल, तर नक्कीच माझी तयारी आहे!”
१४ जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. मला आता माध्यम माहित नाही, पैसा कसा उभा राहील हेही माहित नाही. मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की, जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं… pic.twitter.com/rNoCJQHGcu — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 10, 2026
तसेच पुढे ते म्हणतात की, “Gen Z विषयी सगळे बोलतात. तरुणाईकडून सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या तरुणाईचा वैचारिक पिंड तसा पोसला आहे का? त्यांची वैचारिक बैठक तशा पद्धतीने तयार केली गेली आहे का? आणि जर ती तयार झाली नसेल, जर ती अर्धवट आणि कच्ची असेल, तर तिला घडवण्याची, त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची जबाबदारी कोणाची आहे? एवढंच फक्त चिंतन करणं आजच्या परिस्थितीत गरजेचं आहे!”
Gen Z विषयी सगळे बोलतात. तरुणाईकडून सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या तरुणाईचा वैचारिक पिंड तसा पोसला आहे का? त्यांची वैचारिक बैठक तशा पद्धतीने तयार केली गेली आहे का? आणि जर ती तयार झाली नसेल, जर ती अर्धवट आणि कच्ची असेल, तर तिला घडवण्याची, त्यांच्यावर… pic.twitter.com/1F1zIgMPe3 — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 10, 2026
अमोल कोल्हे जरी म्हंटले की 14 जूनला मालिकेचा अंतिम भाग प्रसारित होईल, त्यांनतर मालिका बंद करण्यात येईल, तरी मालिका त्याच आठवड्यात पुन्हा सुरु करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तरी मालिका चाहत्यांना Mi Savitribai Jotirao Phule मालिका Star Plus वाहिनेवर की OTT वर प्रसारित केले जाईल? हे पाहणे फार महत्वाचे ठरेल.






