(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. चित्रपटातील रणवीर सिंगच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ‘धुरंधर’ डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला, तर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झाला. रणवीर सिंग व्यतिरिक्त, या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सौम्या टंडन, राकेश बेदी आणि अक्षय खन्ना यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. जिओ स्टुडिओच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवले आहे. अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पत्र लिहून कळवले आहे की, ‘धुरंधर फ्रँचायझी’ने जगभरात ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली असून, जिओ स्टुडिओला अव्वल स्थानी पोहोचवले आहे. या पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे की, या चित्रपटांनी भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ४०% पेक्षा जास्त वाटा उचलला आहे. चित्रपटांच्या खर्चाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर द रिव्हेंज’च्या निर्मितीवर अंदाजे ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. इतकेच नाही तर, त्यांनी असा दावा केला की, गेल्या तीन वर्षांपासून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करण्याचा मान जिओ स्टुडिओने मिळवला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, २०२४ मध्ये प्रदर्शित होणारा ‘स्त्री २’, २०२५ मध्ये ‘धुरंधर’ आणि २०२६ मध्ये ‘धुरंधर द रिव्हेंज’ या चित्रपटांमुळे जिओ स्टुडिओची सातत्यपूर्ण वाढ होत आहे
चिंगी प्रेग्नेंट! स्वानंदी अंशुमनचं बिंग फोडणार, राजवाडेंना बसणार धक्का; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट
अंबानींनी स्पष्ट केले की, २०२५ आणि २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर द रिव्हेंज’ या चित्रपटांनी जिओ स्टुडिओला एक वेगळी ओळख दिली आहे. ‘धुरंधर फ्रँचायझी’मधील दोन्ही चित्रपट हे स्पाय थ्रिलर असून ते प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. त्यांनी कमाईच्या बाबतीतही अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. मुकेश अंबानींनी असेही म्हटले की, जिओ स्टुडिओने कथाकथन आणि सादरीकरणामध्ये एक मोठा बदल घडवून आणला आहे. गेल्या आठ वर्षांत, जिओ स्टुडिओने असे अनेक चित्रपट तयार केले आहेत जे प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. अंबानींनी पत्रात पुढे लिहिले की, जिओ स्टुडिओने आपल्या सर्जनशील आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून स्वतःला नंबर वन कंटेंट स्टुडिओ म्हणून स्थापित केले आहे.






