(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जुळली गाठ गं’ सध्या रंजक वळणावर आली आहे. सावी आणि धैर्य यांना वेगळं करण्यासाठी दामिनी सतत कट रचताना दिसत आहे.काही दिवसांपूर्वी सावीच्या आयुष्यात अंगद नावाचा व्यक्ती आला. तो स्वतःला तिच्या भावाचा विद्यार्थी असल्याचं सांगतो आणि आपल्या व्यवसायासाठी सावीची मदत मागतो. मदतीच्या उद्देशाने सावी होकार देते, मात्र नकळत ती मोठ्या अडचणीत सापडते.अंगद प्रकरणात सावीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि विनयभंगाचा आरोप करण्यात येतो. या आरोपांमुळे सावीला अटक होते. सध्या या खोट्या आरोपातून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सावी संघर्ष करताना दिसत आहे.
या लढाईत सावीच्या मदतीसाठी ‘सन मराठी’ वरील सदस्य एकत्र येणार आहेत. इन्स्पेक्टर मंजू सुरुवातीपासूनच सावीच्या मदतीसाठी धावून आली आहे. तर कायद्याच्या कचाट्यातून सोडवायला राणी देखील सावी सोबत उभी आहे. पण आता अर्पिता, अनुप्रिया, आणि वैदही यांचीही साथ सावीला मिळणार आहे. राणी, मंजू, अर्पिता, अनुप्रिया, वैदेही या पंचकन्या सावीला कसं निर्दोष सिद्ध करतील? आणि हे करताना त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील आहे.
Mardaani 3 Box Office: ‘मर्दानी ३’ सातव्या दिवशीही घसरला, बुधवारी बॉक्स ऑफिसवर फक्त एवढीच कमाई
या पंचकन्यांच्या विशेष भागाबद्दल सावी म्हणजेच अभिनेत्री पायल मेमाणे म्हणाली की, “सावी हे पात्र घराघरात पोहोचलं आहे. सावी ही लग्न आधी बेधडक होती. पण लग्नानंतर तिच्यात काही बदल झाले आहेत. सध्या सावी वर प्रचंड मोठ संकट आलेल आहे. विनयभंगाचा खोटा आरोप लागून ती तिच्या अस्तित्वाची लढाई लढतीये. आज महाराष्ट्रात बऱ्याच महिलांवर अन्याय होत असेल त्या अन्यायाला सामोरं कसं जायचं हेच आमच्या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. सावीच्या मदतीसाठी इतर मालिकेतील अभिनेत्री ही एकत्र आल्या आहेत. या पंचकन्या अन्यायाचा संहार कसा करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.






