( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )
पंजाबी आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक गुरू रंधावाच्या जिमवर गुरुवारी पहाटे जोरदार गोळीबार झाला. त्याची ’24HS फिटनेस दिल्ली’ नावाची जिम दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात आहे. या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारच्या घटना घडवणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. या संपूर्ण घटनेचा संबंध सलमान खानशी असल्याचे म्हटले जात आहे.
नवभारत टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार, “दिनांक ११/०६/२६ रोजी पहाटे, पश्चिम विहार पूर्व पोलीस ठाण्याला दिल्लीतील पश्चिम विहार येथील पुष्कर एन्क्लेव्हमधील ‘२४ एचएस फिटनेस जिम’मध्ये गोळीबार झाल्याची माहिती देणारा पीसीआर कॉल आला. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, बाईकवरून आलेल्या आणि चेहरा कापडाने झाकलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी जिमच्या काचेवर काही गोळ्या झाडल्या. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. स्थानिक आणि जिल्हा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून, योग्य कायदेशीर कारवाई सुरू केली जात आहे. आरोपींना लवकरात लवकर ओळखण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली असून, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.”
गोळीबाराची माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका सदस्याने सोशल मीडियावर पोस्ट करत, रंधावाने यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यांचा स्पष्टपणे उल्लेख केला. त्याने लिहिले, “तो सलमान खानच्या खूप जवळ जात होता. आम्ही त्याला यापूर्वीच त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, कारण तो आमचा शत्रू आहे.””आम्ही सलमानला यापूर्वीच त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, कारण तो आमचा शत्रू आहे.”

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )
लॉरेन्स बिश्नोई गटाशी संबंधित असलेल्या अनिल पंडित यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यात या घटनेचे स्पष्टीकरण दिले आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “गुरु रंधावाच्या जिम, ’24 HS फिटनेस दिल्ली’ येथे झालेला गोळीबार मी, अनिल पंडित यूएसए आणि लॉरेन्स बिश्नोई गटाने केला आहे. तो सलमान खानच्या खूप जवळ जात होता. आम्ही त्याला यापूर्वीच त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, कारण तो आमचा शत्रू आहे, पण त्याने ऐकले नाही. आमचे शत्रू कुठेही लपले असले तरी, आम्ही लवकरच त्या सर्वांना भेटू.”






