फोटो सौजन्य : गुगल
सायली अर्जुन जशी लोकप्रिय जोडी आहे तसंच साक्षी, नागराज आणि महिपत यांनी साकारलेले नकारात्मक व्यक्तिरेखा देखील घराघरात पोहोचले आहेत. यांचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र साक्षीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्याचं समोर येत आहे. साक्षी शिखरेचं पात्र साकारणारी अभिनेत्री केतकी पालव हिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
केतकीने याबाबत एका मुलाखतीत सांगितलं आहे की, साक्षीचं पात्र गेले तीन वर्ष केतकीने उत्तमरित्या साकारलं. पण आता तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेण्यामागे देखील तितकच महत्वाचं कारण आहे. साक्षीने एका मुलाखतीत सांगितलं की, “साक्षी या पात्राचा तीन वर्षांचा प्रवास इथेच थांबवताना खूप कठीण जात आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. शुटींग आणि माझे एका नाटकाचे प्रयोग सुरु असल्याने मला माझ्या सात वर्षांच्या मुलीला आणि कुटुंबाला वेळ देता येत नव्हता. सुरुवातीला हे प्रयोग कमी असायचे त्यामुळे मी नाटकाचे दौरे आणि शूटिंग दोन्ही गोष्टी एकत्र मॅनेज होत होत्या. पण, आता नाटकाला देखील भरपूर प्रतिसाद मिळतोय, प्रयोग वाढलेत. हे सगळं एकत्र सांभाळणं म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत आहे. म्हणूनच मला मालिका सोडण्याचा हा जड निर्णय घ्यावा लागत आहे. यासाठी मला ‘ठरलं तर मग’च्या टीमने सुद्धा सकारात्मक पाठिंबा दिला, मला नीट समजून घेतलं.”याशिवाय सेटवर खूप हेल्दी वातावरण असतं, त्यामुळे मी सर्वांना मिस करणार असंही केतकीने या मुलाखतीत सांगितलं. सगळ्यांच्या टीमवर्कमुळे आज मालिकेला एवढं मोठं यश मिळतंय असंही ती म्हणाली. आता केतकीच्या जागी मालिकेत कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






