नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड, प्रसाद लाड (Koshyari, Mangalprabhat Lodha and Sanjay Gaikwad, Prasad lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून, भाजपाच्या नेत्याविरोधात शिवप्रेमी तसेच विरोधक आंदोलन करत असून, यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राज्यातून हकालपट्टी व्हावी, या मागणीला जोर धरत आहे.
[read_also content=”ट्विटर आता 280 ऐवजी 420 शब्दमर्यादा वाढवणार, मस्क यांनी यूजर्सला दिले ‘हे’ उत्तर https://www.navarashtra.com/india/twitter-will-now-increase-the-word-limit-musk-replied-to-this-users-352935.html”]
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी व्हावी, या मागणीसाठी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी पीएमओ कार्यालयाला पत्र दिलं होतं. तसेच गृहमंत्री अमित शहांची भेट देखील घेतली होती. त्याआधी त्यांनी राज्यपाल हटावसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आत्मक्लेश केला. दरम्यान, राज्यपालांची हकालपट्टी व्हावी या मागणीला जोर धरत असताना आणि चारीबाजूनी कोंडी झाल्यानंतर स्वत: राज्यपालांनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून स्पष्टिकरण दिले आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपालाचं पत्र नेमकं आजच का बाहेर आलं? त्यावरची तारीख खूप अगोदरची असताना आजच ते उघड कसं झालं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपस्थित केला आहे. पत्रावरील तारीख ६ डिसेंबरची आहे. आणि ते पत्र आज १२ डिसेंबर रोजी कसं बाहेर आलं? यामागे नेमकं काय राजकारण आहे? काय हेतू आहे?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे.
भाजपा नेत्यांची काय आहेत वादग्रस्त वक्तव्यं?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे जुन्या काळातील आदर्श होते. आताच्या काळातील आदर्श नितीन गडकरी आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबची माफी मागितली होती, असं विधानं केलं. मंत्री मंगलप्रभात लोढा व संजय गायकवाड यांनी शिंदे गटाने केलेल्या बंडाची तुलना महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म शिवनेरीवर झाला नसून, कोकणात झाला आहे. आणि महाराजांचे बालपण रायगडावर गेले आहे असं म्हटलंय. यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून भाजपाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.