(फोटो सौजन्य: Pinterest)
जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…
लोणावळा
पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर लोणावळा तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय आहे. मुंबईपासून सुमारे ९६ किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण येथील प्रसिद्ध चिक्की, हिरवेगार डोंगर आणि सुंदर धबधब्यांसाठी ओळखले जाते. इथे तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद लुटु शकता. फिरुन थकल्यास आरामासाठी इथे लग्झरी रेसाॅर्ट्स देखील आहेत.
खंडाळा
मुंबईतील लोकप्रिय ठिकाणांमध्ये खंडाळ्याचे नाव आवर्जून येते. लोणावळ्यापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर वसलेले हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यात इथले निसर्गरम्य दृष्य पाहायला फार छान वाटते. भुशी डॅम, राजमाची किल्ला, ड्यूज पॉईंट, टायगर लीप ही इथली काही प्रसिद्ध फिरण्यासाठीची ठिकाणे आहेत.
मुरुड
मुरुड हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हे मुंबईपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण वसले आहे. सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि ऐतिहासिक मुरुड-जंजिरा जलदुर्गासाठी हे ठिकाण प्रामुख्याने ओळखले जाते. इथे तुम्ही ताज्या माशांच्या आस्वाद घेऊ शकता. इथले आल्हाददायक वातावरण मनाला चांगला अनुभव देते.
एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?
माळशेज घाट
जर तुम्हाला ट्रेकिंग किंवा पक्ष्यांची आवड असेल तर माळशेज घाट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. पिंपळगाव जोगा धरणावर तुम्हाला फ्लेमिंगो आणि किंगफिशरसह अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील. आजोबा टेकडी किल्ल्यावर धबधब्यांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येतो.
इगतपुरी
जर तुम्ही एका शांत ठिकाणाच्या शोधात असाल तर इगतपुरी तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण धबधबे, किल्ले आणि तेथील निसर्गसाैंदर्यासाठी प्रचलित आहे.






