UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट
जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…
सारनाथ
उत्तर प्रदेशातील सारनाथ हे ठिकाण युनेस्कोच्या यादीतील भारतातील ४५ वे स्थळ बनले आहे. हे ठिकाण भगवान बुद्धांशी संबंधित असल्याने दरवर्षी मोठ्या इथे संख्येने पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. हे बाैद्ध धर्माचे अत्यंत आदरणीय स्थळ मानले जाते.
ताजमहाल
आग्र्यातील ताजमहाल जगभरातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण आहे. याचा इतिहास आणि सफेद संगमरमरपासून बनलेला हा महाल अनेकांना थक्क करणारा आहे. शाहजहानने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ हा महाल बांधला होता ज्यामुळे त्याला प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जाते.
कोणार्क सूर्य मंदिर
ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिर तेथील दगडी डिजाईनसाठी खास करुन ओळखले जातो. धार्मिक मान्यतेनुसार, स्वत: सूर्यदेवाने या मंदिराची बांधणी केली आहे. पुरी शहरापासून अंदाजे ३५ किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण १३ व्या शतकातील एक प्रसिद्ध मंदिर आहे.
सुंदरबन
सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीने वन म्हणून ओळखले जाते. इथे रॉयल बंगाल टायगरसहस अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणी पाहायला मिळतात. मुलांसोबत सहलीसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.
नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लाॅवर्स
नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लाॅवर्स हे उत्तरखंडमधील दोन सुंदर ठिकाणे आहेत. पर्वत, फुल आणि निसर्गाचे सुंदर दृष्य पाहायला आवडत असेल तर या ठिकाणांची निवड तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल.
पश्चिम घाट
पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेली सुमारे १,६०० किलोमीटर लांबीची एक महत्त्वाची पर्वतराजी आहे. इथे जंगल, हिरवळीने भरलेला प्रदेश पाहायला मिळतो.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
भारताच्या आसाम या राज्यात हे उद्यान वसले असून इथे जगभरातील अनेक निरनिराळ्या प्रकारचे प्राणी पाहयला मिळतात. हे ठिकाण प्रामुख्याने एकशिंगी गेंडा, हत्ती आणि वाघ यांच्या संरक्षणासाठी ओळखले जाते.
राजस्थानचे डोंगरी किल्ले
आपल्या ऐतिहासिक वारशासाठी राजस्थान खास करुन ओळखले जाते. आमेर, चित्तोरगड आणि कुंभलगड यांसारखे अनेक प्राचीन किल्ले पाहायला इथे पर्यटकांची गर्दी असते. किल्ल्यांची भव्यताच भक्त पर्यटकांना याकडे आकर्षित करत नाही तर इथला इतिहास देखील अनेकांना थक्क करणारा आहे.
Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…
खजुराहो मंदिर
मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरे इथले दगडी नक्षीकाम आणि जुन्या इतिहासासाठी प्रामख्याने ओळखले जाते. १२ व्या शतकात या मंदिराची बांधणी केली गेली होती आणि युनेस्कोच्या यादीत याचाही समाविष्ट करण्यात आला आहे.
अजिंठा आणि एलोरा लेणी
जर तुम्हीही एक दिवसासाठी कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर अजिंठा आणि एलोरा लेणी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. इथे भारताचा इतिहास, संस्कृती आणि सौंदर्य जवळून पाहायला मिळते.






