हातापायांना वारंवार सूज येते? शरीरसंबंधित उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या, जाणून घ्या यामागील कारणे आणि उपाय
हातापायांना वारंवार सूज येते?
किडनीचे आरोग्य कशामुळे बिघडते?
हातापायांना सूज येऊ नये म्हणून काय करावे?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा हातापायांना सूज येते. तर काहीवेळा वारंवार शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. ही समस्या जास्त वेळ उभं राहिल्यामुळे किंवा मीठाचे जास्त सेवन, पावसाळ्यात कमी शारीरिक हालचाली इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीराला सूज येण्यामागे अनेक कारण आहेत. किडनी, हृदय, यकृत किंवा थायरॉईडसारख्या गंभीर आजारांमुळे हातापायांना सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला वारंवार सूज येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.(फोटो सौजन्य – istock)
हातापायांना सूज येण्यामागील सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे शरीरात द्रव साचणे. जास्त वेळ एका जागेवर बसून राहिल्यामुळे किंवा शारीरिक हालचाली न केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम केल्यामुळे किंवा सतत उभे राहिल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. याशिवाय आहारात मिठाचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरात पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते, ज्यामुळे हातापायांना सूज येते. त्यामुळे हातापायांना वारंवार सूज येत आल्यासारखे वाटतं असेल तर कमीत कमी मिठाचे सेवन करावे. अन्यथा आरोग्य आणखीनच बिघडू शकते.
राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाळी वातावरणात झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दमट हवामान आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडून जाते. गर्भधारणा, हार्मोनल बदल, काही औषधांचे दुष्परिणाम, लठ्ठपणा इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे हातापायांना सूज येण्याची शक्यता असते. शरीराला सूज आल्यानंतर घरगुती उपाय करून सुद्धा आराम मिळवता येतो. पायांना सूज आल्यास गरम पाण्याचा शेक घ्यावा किंवा गरम पाण्यात काही वेळ पाय बिडवून राहावे. दिवसातून एकदा पाय हृदयाच्या पातळीपेक्षा थोडे उंच ठेवून १५ ते २० मिनिटे विश्रांती घेतल्यास पायांमध्ये साचलेला द्रव वरच्या दिशेने वाहण्यास मदत होते.
Natural Collagen Booster : कोलेजनसाठी हजारो रुपये खर्च कशाला? ‘हे’ 5 पदार्थ करतील नैसर्गिक कमाल
शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात जमा झालेले द्रव बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारते. आहारात कमीत कमी मिठाचे सेवन करावे. पापड, लोणची, चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स आणि जास्त खारट पदार्थ वारंवार खाऊ नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात नेहमीच ताजी फळे, भाज्या आणि पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच जास्त वेळ एका जागेवर बसून राहू नये. यामुळे रक्तभिसरणात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे १ किंवा २ तासानंतर उठून बसून काम करावे.
Ans: हातापायांना सूज येण्यामागे शरीरात पाणी साचणे, रक्ताभिसरणातील अडथळे, मूत्रपिंड, हृदय किंवा यकृताचे विकार, थायरॉईडची समस्या, जास्त वेळ बसणे किंवा उभे राहणे अशी अनेक कारणे असू शकतात.
Ans: मीठाचे प्रमाण कमी ठेवणे, पुरेसे पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, जास्त वेळ एकाच स्थितीत न बसणे आणि पाय उंच ठेवून विश्रांती घेणे फायदेशीर ठरू शकते.
Ans: संतुलित आहार, नियमित चालणे किंवा व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, पुरेशी झोप, जास्त मीठ टाळणे आणि पुरेसे पाणी पिणे या सवयी सूज टाळण्यास मदत करू शकतात.






