भुवयांचे केस गळून पातळ झाले आहेत? मग नॅचरली आयब्रो आणि काळे करण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. स्किन केअर, हेअर केअर तर काहीवेळा त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. मेकअप केल्यानंतर चेहरा अधिक उठावदार आणि सुंदर दिसवा म्हणून आयब्रो थोडे डार्क केले जातात. भुवया डोळ्यांचे धूळ, घाम आणि कचऱ्यापासून रक्षण करतात. पण बऱ्याचदा आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांमुळे भुवयांचे केस पातळ होतात, गळून जातात इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. नियमित १ ते २ केस गळणे अतिशय सामान्य आहे. पण भुवयांचे केस वेगाने विरळ होणे, ठिकठिकाणी चट्टे पडणे किंवा केसांची घनता कमी होणे इत्यादी समस्या शरीराअंतर्गत समस्यांमुळे सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
थायरॉईड, पोषक तत्त्वांची कमतरता, हार्मोन्समधील बदल, ताणतणाव किंवा ऑटोइम्यून आजार झाल्यानंतर भुवयांवरील केस गळण्यास सुरुवात होते. वारंवार थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि चुकीच्या घरगुती उपायांमुळे सुद्धा भुवया विरळ होऊन जातात. एरंडेल तेल, खोबरेल तेल यांसारखे उपाय करून भुवयांवरील केस वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. पण भुवयांवरील केस खूप जास्त विरळ झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया भुवयांचे केस विरळ कशामुळे होतात आणि भुवयांवरील केस वाढवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत.
वारंवार थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा प्लकिंग केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. वारंवार वॅक्सिंग केल्यामुळे नवीन केस वाढत नाहीत. लोह, विटामिन डी, विटामिन बी १२, झिंक, बायोटिन आणि प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर भुवयांचे केस खूप जास्त गळतात. थायरॉईडची समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये भुवयांचा बाहेरील एक-तृतीयांश भाग पातळ होऊन जातो. गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीच्या दिवसांमध्ये महिलांचे केस खूप जास्त गळतात. याशिवाय मानसिक तणाव वाढल्यामुळे किंवा ॲलोपेशिया अरेटा इत्यादी गंभीर समस्यांमुळे भुवयांवरील केस गळून जातात.
एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक ॲसिड, विटामिन ई आणि फॉलिक ॲसिड असते. केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रात्री झोपण्याआधी एरंडेल तेल भुवयांवर लावावे. रात्रभर तसेच ठेवल्यानंतर भुवया पाण्याने स्वच्छ धुवून टाका. याशिवाय भुवयांची घनता वाढवण्यासाठी कोरफड जेल लावावे. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यासोबतच भुवयांचे केस घनदाट होतात. कांद्याच्या रसात सल्फर असते, ज्यामुळे भुवया आणि केसांच्या वाढत्या समस्या कमी होण्यास मदत होते.






